पुणे : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात खुप मोठा प्रतिसाद मिळाला. दक्षिणेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्रात लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. यावेळी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी राज्यातील अनेक कोपऱ्यातून लोक आले होते. तसेच त्याचे स्वागत महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे करण्यात आले. आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात गेली आहे. त्यानंतर ती काश्मीर मध्ये जाणार आहे. त्यातच आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात सफल केल्यामुळे महाराष्ट्रा काॅंग्रेस कमिटीने कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे.
“आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरुवात झाली आणि दोन महिन्यानंतर ७ नोव्हेंबरला या पदयात्रेने नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून महाराष्ट्राल प्रवेश केला. देगलूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यासमोर हजारो लोकांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना अभिवादन करून राहुलजी व भारतयात्रींनी हजारो मशाली हाती घेत क्रांतीची मशाल पेटवली.
मंदिर, मशिद, बौद्ध विहार, गुरुद्वारामध्ये जाऊन भारताची खरी ओळख असलेल्या विविधततेली एकतेचे दर्शन केले. देगलूर येथून सुरु झालेला महाराष्ट्रातील पदयात्रेचा हा प्रवास बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे संपला. १४ दिवासांच्या या प्रवासात रस्त्याच्या दुतर्फा दररोज हजारो लोक जमा होऊन राहुलजी गांधी व भारतयात्रीची आतुरतेने वाट पहात असल्याचे चित्र दिसले. पहाटेच्या वेळी माता भगिणींनी यात्रा मार्गावर सडा टाकून रांगोळी काढून यात्रेचे स्वागत केले. या मार्गावर महाराष्ट्रातील विविध संस्कृतीचे दर्शन घडले. लोकांनी उस्फूर्तपणे येऊन भारत जोडो यात्रेत आपले योगदान दिले. नादेड व शेगाव येथील जनसभेने तर गर्दीचे उच्चाक मोडले, विशेषतः शेगाव येथे जमलेला लाखोंचा जनसमुदाय परिवर्तनाचे संकेत देऊन गेला. सभास्थळ भरगच्च भरले होतेच पण सभास्थळाच्या आजूबाजूचा परिसरही लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ही फक्त सभेची गर्दी नव्हती तर इतिहास घडवणाऱ्या एका महत्वपूर्ण घटनेचे ते साक्षीदार झाले.
“हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
राहुलजी गांधी यांच्या बरोबर चालणान्या सर्व भारतयात्रीचे आदरातिथ्य करण्यात महाराष्ट्राने कसलीही कमतरता ठेवली नाही. दररोज हजारो लोकांच्या राहण्याची, त्यांच्या जेवणाची, विश्रांतीची औषधोपचारांची व्यवस्थीतपणे काळजी घेतली. आपण सढळ हस्ते सेवाकार्यात सहभागी झालात. याकामी हजारो लोक झटले, रस्त्यांच्या कडेला उभे राहून भारतयात्रींना फळे, पाणी, चहा देण्याचे काम स्वच्छेने केले. भारत जोडो यात्रा ही आपल्याच घरचे कार्य आहे असे समजून हजारो ज्ञात-अज्ञात हातांनी सहभागी होत आपापल्या परिने योगदान दिले.
‘अतिथी देवो भव’ ची महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली आहे. पंढरपुरच्या विठुरायाला भेटण्यासाठी दरवर्षी जशा पालख्या निघतात व यातील वारकऱ्याचे स्वागत व आदरातिथ्य मराठी माणूस करतो त्याच पवित्र भावनेचे दर्शन या पदयात्रेतही झाले. हीच महाराष्ट्राची संस्कृती व परंपरा आहे. भारतयात्रीच्या पाहुणचारात आपण तसुभरही कमी पडू दिले नाही. भारत जोडो यात्रेच्या या महायज्ञात प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला एक संदेश दिला आहे. ही पदयात्रा यशस्वीपणे पार पाडण्यात महाराष्ट्रातील जनतेसोबतच अनेकांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
Read also
- शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
- “देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
- “विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
- “भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबली नाही, फक्त मतांच्या गणितांसाठी करावं लागतं”; देवेंद्र फडणवीस
- बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन