मुंबई : महाविकास आघाडी सरकार असताना आघाडीतील काही नेत्यांवर भाजपच्या नेत्यांनी सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे सर्वच समीकरणं बदललीत. ज्यांच्यावर भाजप नेते आरोप करीत होते. ते नेत्यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजपचे नेते शांत असल्याचं दिसून आलं. त्यावर विरोधातील नेते सातत्याने भाजपला यावरून डिवचत आहेत. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी-भाजपच्या लढाईत आता ‘आप’ची ही उडी..! खेड आळंदी मतदार संघात जोरदार चुरस होणार…?
भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून कोणत्याही राजकीय नेत्यावरील यंत्रणांची चौकशी थांबलेली नाही. राजकारणात मतांचे गणित महत्त्वाचे असते. ते जुळवण्यसाठी पक्षात प्रवेश दिला जातो. अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विरोधी पक्षांकडून सातत्याने भाजपवर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापरावरून आरोप केला जातो. तसेच अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांचा दवाब टाकला जातो. असाही आरोप होतोय. त्यामुळेच अनेक नेत्यांनी या दबावाला बळी पडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
“भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे सारखे बडे नेत्यांचा समावेश आहे. तर शिवसेनेतील भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, यामिनी जाधव, संजय राठोड यांसारखे अनेक नेत्यांच्या मागे इडीचा ससेमिरा लागला आहे. आघाडी सरकार सत्तेत असताना या नेत्यांवर भाजपचे नेते सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत कारवाई करत असल्याची मागणी करीत होते. मात्र सरकार बदल झाल्याने हे सर्व नेते आता शांत झाले आहेत.
“तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर सायबर क्राईमबाबत देखील भाष्य केलं आहे. सोशल मीडियाबरोबर आर्थिक गुन्हेगारी आणि सायबर क्राईमचा प्रश्नही सोडवण्यासाठी राज्य सरकार महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेत असून, पासपोर्ट कार्यालायप्रमाणे त्याचे आऊटसोर्सिंग करण्याचा विचार करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून केले जाणारे ट्रोलिंग, अपप्रचार, तसेच तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबतच वाढणारी सायबर गुन्हेगारी, आणि आर्थिक गुन्हेगारींला आळा घालण्यासाठी राज्य सरकार नवी व्यवस्था उभी करण्याचा विचार करीत असल्याचं फडणवीसांना सांगितलं आहे.
Read also
- बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
- “आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- “हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
- “राज्यातील सॅम्पल दुसरीकडे पाठवा..! नाहीतर सगळेजण एकत्र येऊन इंगा दाखवू”; ठाकरेंकडून महाराष्ट्र बंद चे संकेत
- “मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात