मुंबई : आगामी काही दिवसात गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी राज्यातील सगळेच भाजपचे नेते गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये गेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या मंत्र्यांचा देखील समावेश आहे. त्यासाठीच काल मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी
महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले, मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरूणांचा रोजगार पळवला. आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. 1 तासही यांच्याकडे वेळ नाही. असं म्हणत काल मंत्रीमंडळाची बैठक का रद्द झाली? याचे उत्तर खोके सरकारने दिले पाहिजे. असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
पीक विमा, ओला दुष्काळ, वीज प्रश्न अश्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रीत करतंय. मंत्रीमंडळ बैठक रद्द होतेय. महाराष्ट्रात हे काय चाललंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे सरकार नेमकं आहे कुणासाठी? या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का ? असा उपरोधिक सवाल आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला केला आहे.
दरम्यान, काल मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे जाऊन ज्योतिषाकडून भविष्य बघितल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यावरूनही शिंदे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टिका केली जात आहे.
Read also
- राष्ट्रवादी-भाजपच्या लढाईत आता ‘आप’ची ही उडी..! खेड आळंदी मतदार संघात जोरदार चुरस होणार…?
- “भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
- “तुम्हाला महाराष्ट्र असा-तसा वाटला का?” कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर अजित पवार संतापले
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्य़ांची पुन्हा चेतावणी..! आता थेट सोलापुर अन् अक्कलकोटवर ठोकला दावा
- “आता काय बोलावं ?पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात ;” अजित पवारांचा खोचक टोला