मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील जवळपास सगळ्याच राजकीय नेत्यांनी राज्यापालांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्यातच आता खासदार उदयन राजे यांनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून काढून टाकण्यात यावे असं पत्र उदयनराजे यांनी दिलं आहे.
आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा
त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे, हे अभिमानास्पद आहे. मात्र काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जाणीवपुर्वक वादग्रस्त वक्तव्ये करून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या आस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. याकडे अतिशय गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.
“जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये”; जयंत पाटील
दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी आलेल्या दोन वक्तव्यांनी महाराष्ट्राचे समाजमन संतप्त बनले आहे. त्यातील पहिले वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आहे आणि दुसरे वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे. पण यापुर्वीही कोश्यारी यांनी समर्थ रामदास गुरु होते म्हणून वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचे आहे. त्यांची ही वक्तव्ये निषेधार्ह आहेत. मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो.
आदित्य ठाकरेंनी घेतली तेजस्वी यादवांची भेट…! राजकीय वर्तुळात चर्चा
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराजांचा अपमान तर केलाच आहे. पण यापुर्वीही कोश्यारी यांनी, समर्थ रामदास गुरु होते म्हणून महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले, रामदास नसते तर ते शक्य झाले नसते, या आशयाचे विधान केल होते, शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यापूर्वी महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले होते. ही सर्व वक्तव्ये त्यांनी जाहीर कार्यक्रमात केली आहेत. त्यांचा जनमानसांतून निषेध होऊनही ते स्वतः बदलायला तयार नाहीत. त्यांची महाराष्ट्रात अडीच वर्षे कारकिर्द होऊनही त्यांना शिवराय समजले नाहीत. ही बाब दुर्दैवी आहे.
राज्यपाल हे घटनात्मक पद असतानादेखील दिवसेंदिवस आपल्या पदाची प्रतिष्ठा रसातळाला नेत आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मात्र अशोभनीय वर्तन केले आहे. हे खेदाने नमूद करावे लागत आहे. त्याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे इतिहास संशोधक नाहीत तरीही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या संपूर्ण पार्श्वभुमीवर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना तातडीने पदावरून दूर करावे, अशी तमाम जनतेची मागणी आहे. आपण यांवर योग्य ती कार्यवाही कराल याची मला खात्री आहे.
Read also
- साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
- बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील, आमदार महेश लांडगे अन् टीम दिल्लीला रवाना
- “देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं
- “..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या
- पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योगांना राज्य सरकारचे ‘‘रेड कार्पेट’’..! मुंबईतील मॅरेथॉन बैठकीत प्रलंबित प्रश्नांना गती