मुंबई : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा ठोकला आहे. त्यानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर ताशोरे ओढले असून महाराष्ट्राची एक इंच जागा देखील जाऊ देणार नसल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा बसवराज बोम्मई यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
“..तर आमचीही वेळ येणारच, मग तुम्हाला चुन चुन के…?” रूपाली पाटील कडाडल्या
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. परंतु त्यांचे हे स्वप्न कधीच पुर्ण होणार नाही. जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापुर, अक्कलकोट यासारखे कन्नड भाषिक भाग कर्नाटकात सामील व्हावेत, अशी मागणी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर 2004 पासून महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करत आहे. आतापर्यंत आम्हाला यश आले नाही. यापुढे ते होणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबुत करण्यासाठी आम्ही तयार आहेत. असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र राज्य सरकारलाचं आव्हान दिलं आहे.
आम आदमी पार्टीचा खेडमध्ये ‘‘युवा संवाद’’..! खेड- आळंदी विधानसभा मतदार संघातील प्रश्नांवर होणार चर्चा
दरम्यान, महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे आगामी काही काळात काय राजकीय घडामोडी घडणार ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇದ್ರ ಫಡ್ನವಿಸ್ ಅವರು ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದು, ಅವರ ಕನಸು ಎಂದೂ ನನಸಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾಡಿನ ನೆಲ, ಜಲ, ಗಡಿ ರಕ್ಷಣೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕಟಿ ಬದ್ಧವಾಗಿದೆ.
1/3— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
Read also
- “आता काय बोलावं ?पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात ;” अजित पवारांचा खोचक टोला
- कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवा..! उदयन राजेंचं पत्राद्वारे मागणी
- साकडं पुर्ण झालं…! प्रताप सरनाईकांनी तुळजाभवानीला अर्पण केलं 75 तोळं सोनं
- बैलगाडा शर्यतीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा स्व-खर्चाने वकील, आमदार महेश लांडगे अन् टीम दिल्लीला रवाना
- “देवदर्शन, भविष्य, अन् रेड्याचा बळी देऊ द्या, कारण..” राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना डिवचलं