मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद उकरून काढल्याने राज्यात राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. यावरून राज्यातील विरोधी पक्ष राज्य सरकारवर कडाडून टिका करताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे.
“मंत्रिमंडळ बैठक रद्द करून खोके सरकार गुजरात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त”; आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज्यातील अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रा बाहेर गेले. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलने केलीत. आता पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही भागांवर दावा ठोकला आहे. त्यावरून विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ? असा सवाल राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे.
राष्ट्रवादी-भाजपच्या लढाईत आता ‘आप’ची ही उडी..! खेड आळंदी मतदार संघात जोरदार चुरस होणार…?
महाविकास आघाडी सरकार पाडून शिवसेनेचे 40 अन् अपक्ष आमदारांनी बंड पुकारला. अन् भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं. यानंतर बंडखोर आमदारांनी 50 खोके म्हणजे प्रत्येकी 50 कोटी रूपये भाजपने दिले असल्याचा आरोप केला गेला. या बंडखोर आमदारांबाबत त्यानंतर मग 50 खोके एकदम ओक्के अशी खोचक टिप्पणी प्रसिद्ध झाली. त्यातच आता महाराष्ट्रातील प्रकल्पाबरोबरच काही भागांवर कर्नाटक सरकारने दावा ठोकल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.
“भविष्य नाही तर दुसऱ्याचं कामासाठी मुख्यमंत्री गेले होते..!” त्या ज्योतिषानेच केला मोठा खुलासा
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सीमाभागातील मराठी भाषक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सीमा भागात 1955 सालापासून कार्यरत बेळगाव जिल्ह्यातील विद्यावर्धक समिती कागवाडच्या मराठी प्राथमिक शाळेसह सीमाभागातील मराठी शाळांना तातडीनं विशेष अनुदान मंजूर करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच सीमाभागातील मराठी भाषकांना न्याय देण्यासाठी तसंच मराठी भाषेला चालना देण्यासाठी सीमाभागातील मराठी प्राथमिक शाळेला महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीमधून अनुदान मंजूर करून सीमाभागातील मराठी विद्यार्थ्यांना शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
विकत घेतले आमदार
म्हणून
महाराष्ट्र विकायचा असतो का ?@Dev_Fadnavis— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) November 25, 2022
Read also
- “भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची चौकशी थांबली नाही, फक्त मतांच्या गणितांसाठी करावं लागतं”; देवेंद्र फडणवीस
- बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
- “आता जनताच करारा जबाव देणार”; रूपाली पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
- “हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र”; शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा घेतला समाचार
- “राज्यातील सॅम्पल दुसरीकडे पाठवा..! नाहीतर सगळेजण एकत्र येऊन इंगा दाखवू”; ठाकरेंकडून महाराष्ट्र बंद चे संकेत