मुंबई : काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये गेली आहे. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बिहार दौरा केला. त्यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले आहेत. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलोव करतो. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पुर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही. असा खोचक टोला ही नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.
बंडखोर आमदारांची पुन्हा एकदा गुवाहाटी वारी.! कामाख्या देवीचं घेणार दर्शन
अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते. त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्रात खूप चांगलं झालं असतं. असही त्या म्हणाल्या आहेत.
Read also
- “शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
- यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
- शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
- “देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
- “विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल