मुंबई : गुजरात मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्याने राज्यातील अनेक भाजपचे नेते गुजरातमध्ये गेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गुजरातमध्ये जाऊन आलेत. त्यातच आता मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलारही गुजरातला गेले आहेत. मात्र यावेळी आशिष शेलार यांनी गुजरातमधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावरून राष्ट्रवादीने आशिष शेलार यांना चांगलाच टोला हाणला आहे.
“विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
आपल्या मालकाला खुश करण्यासाठी गुजरातच्या शेतकऱ्यांची विचारपुस करतात. मात्र ज्या राज्यात आमदारकी मिरवता. त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आशिष शेलारांना काळजी वाटत नाही. याचा अर्थ भाकरी महाराष्ट्राची आणि चाकरी गुजरातची. असा टोला हाणला आहे. आशिष शेलारांचं राज्यातील शेतकऱ्यांवरील महाराष्ट्र प्रेम बेगडी आहे. हे यातून सिद्ध होतंय. असंही त्यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. राज्यात बेकायदेशीर सरकार आल्यापासून इतर राज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले सुरू केले. गुजरातने उद्योग पळवले. तर आता कर्नाटक महाराष्ट्रातील गावे घशात घालण्याची भाषा करतात तरी देखील मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यामुले मिंधे सरकार लवकरच उलथवून लावले पाहिजे. यातच सर्वांचे हित आहे.
आपल्या मालकाला खुश करण्यासाठी गुजरातच्या शेतकऱ्यांची विचारपूस करतात,मात्र ज्या राज्यात आमदारकी मिरवता त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आशिष शेलारांना काळजी वाटत नाही.याचा अर्थ भाकरी महाराष्ट्राची आणि चाकरी गुजरातची! @BJP4Maharashtra @ShelarAshish #महाराष्ट्रद्रोहीभाजप
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) November 25, 2022
Read also
- “एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही
- “शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
- यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
- शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
- “देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला