मुंबई : राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भगतसिंह कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यातच राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुचक वक्तव्य केलं आहे.
“गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या बेताल वक्तवव्याने महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले आहे. उद्रेक असताना सुद्धा दोघांनी अद्यापही माफी मागितली नाही. या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. जेणेकरून परत कुणी अशी हिमंत करणार नाही. असा कडक इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
“देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल
त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातील दोघेही राजे यांनी राज्यपालांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. महापुरूषांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यातच खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read also
- राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
- “ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
- “पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
- “देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
- “शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू