मुंबई : शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरून विरोधक भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर तूटून पडत आहेत. पत्रकार परिषदेत देखील चित्रा वाघ यांना संजय राठोड प्रकरणावरून सातत्याने प्रश्न विचारला जातो. यातच शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. यावरून चित्रा वाघ यांनी अंधारे यांना टोला हाणला आहे. आता त्यालाच अंधारे यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आमची मिमिक्री करून त्या शिट्टा आणि टाळ्या मिळवतात. मात्र मागील अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असे काहीही नाही. त्या त्यांचे काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू, असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचे नाव घेऊन त्यांचे दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं.
“ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
त्यावर आता सुषमा अंधारे यांनी संजय राठोड प्रकरणावरून चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. स्वत: च्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पुजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या चित्रा वाघ यांनी आधी मंत्रीमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. अस सुचक वक्तव्य केलं आहे. तर अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय. असा टोलाही त्यांनी हाणला.
स्वतःच्या राजकीय करिअरसाठी भटक्या विमुक्तातील पूजा चव्हाण सारख्या एका माऊलीच्या अब्रूचं खोबरं उधळणाऱ्या @ChitraKWagh यांनी आधी मंत्रिमंडळात बसून अचकट विचकट बोलणाऱ्या मंत्र्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या.
अरेच्च्या विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय..!!@ShivsenaComms— SushmaTai Andhare (@andharesushama) November 29, 2022
Read also
- “चुक केली होती, ती फक्त दुरूस्त केली”; कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…! सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- “अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
- राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”
- “या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी