खेड | विशेष प्रतिनिधी, मंगळवार दिनांक २९/११/२०२२ रोजी खेड तहसीलदार कार्यालयात गायरान जमीनीबाबत येलवाडी अतिक्रमित बांधवांच्या वतीने आम आदमी युवा आघाडी कडून निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये येलवाडी मधील ३४० कुटुंबांना अतिक्रमणा संदर्भात नोटीस प्राप्त झाल्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून गेली ३५ते ४0 वर्ष कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास असून नियमित घरपट्टी भरत असून त्यांच्या घरांच्यानोंदीही झालेल्या आहेत. असे असताना नोटीसा देऊन या लोकांना भयभीत करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बाधित शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
“चुक केली होती, ती फक्त दुरूस्त केली”; कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया
तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येने बाधित व्यक्ती उपस्थित होत्या. तहसील कार्यालयात महसूल नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देण्यासाठी जाताना मोठ्या संख्येने आलेल्या बाधित लोकांनी घरे आमच्या हक्काची! नाही कुणाच्या बापाची! शेतकरी एकजुटीचा! विजय असो! हम सब! एक है! झालीच पाहिजे झालीच पाहिजे! घरे आमची नियमित झालीच पाहिजे! अशा घोषणा देऊन परिसर दणकून टाकला होता. निवेदन दिल्या नंतर नायब तहसीलदार संजय शिंदे यांनी आपले निवेदन शासकीय पातळीवर कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल व योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…! सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
निवेदनामध्ये बाधित कुटुंबीयांनी जर लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला नाही. तर पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आत्मक्लेषाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील दिला. निवेदन देण्यासाठी, बाधित कुटुंबीयांच्या वतीने सागर गाडे, गणेश गाडे, अमर सरतापे, राजू गायकवाड, पारूबाई बोत्रे, महादेव गायकवाड, देवलिंग पेटे, हे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
“अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
तहसीलदार कचेरी समोर निवेदन देते वेळी उपस्थित कुटुंबीयांना आम आदमी युवा आघाडी तालुका प्रमुख मयूर दौंडकर, आम आदमी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष, भरत पवळे, सचिनभाऊ राक्षे (पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शिवशंभु छावाप्रतिष्ठान) संपतशेठ गावडे (संघटक पश्चिममहाराष्ट्र शिवशंभू छावा प्रतिष्ठान) दत्ताभाऊ टाकळकर (पुणे जिल्हाध्यक्ष, शिवशंभू छावाप्रतिष्ठान, प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले आणि बाधित कुटुंबीयांना दिलासा दिला. गायरान निवासी शेतकऱ्यांना न्याय दिल्या शिवाय लढा थांबायचां नाही असे यावेळी आश्वासन संबंधितांनी दिले. निवेदन देण्यासाठी महिला, तरुण, वयोवृद्ध, बाधित शेतकरी२०० पेक्षा अधिक संख्येने बाधित लोक उपस्थित होते.
Read also
- “या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
- “बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत
- “महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ
- “सध्या राजकारणाची पातळी खुपच घसरली, आत्मचिंतनाची गरज”; सुप्रिया सुळे
- “अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात