मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अलिकडेच पक्षप्रमुखांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात त्यांनी राज्यातील राजकारणावर परखडपणे भाष्य केले. मात्र त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेकडून जहरी टिका करण्यात आली. निवडणुका आल्या की, कोणाची तरी सुपारी वाजवायची हा धंदा सध्या राज ठाकरे यांचा असल्याचा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी लगावला. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
“सध्या राजकारणाची पातळी खुपच घसरली, आत्मचिंतनाची गरज”; सुप्रिया सुळे
कोणी काहीही शितोंडे उडवले, तरी मी कोणासाठीही काम करीत नाही, महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी काम करतो. पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे सुरू आहेत. असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात होऊ घातलेली मुंबई महापालिकेची निवडणुकही स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे भाजप-शिंदे- आणि मनसे युती होण्याची शक्यता आता कमीच आहे.
“अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात
पक्षप्रमुखांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुंबई महापालिकेतील सर्व प्रभागात जाऊन लोकांच्या समस्या ऐका, काय लागेल ते द्या. तसेच ही निवडणुक आपणच जिंकणारच असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त करून दाखविला. त्यामुळे मनसे स्वंतत्रपणे निवडणुका लढविण्यावर ठाम झाली आहे.
“चुक केली होती, ती फक्त दुरूस्त केली”; कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया
दरम्यान, दुसरीकडे काल भीमशक्ती आणि शिवशक्ती पुन्हा एकदा एकत्रित निवडणुका लढविणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. काल शिवसेना आणि वंचितच्या नेत्यांमध्ये बैठका देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका ह्या शिवसेना आणि वंचित युतीत लढविणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी
- येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
- “या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
- “बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत
- “महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ