सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या कार्यक्रमात अजून एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. मात्र यावेळी दुसरे कोणी नसून शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका प्रसंगाची तुलना एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झाला आहे.
रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी
आज प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं. पण स्वराज्यसाठी ते बाहेर पडले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं. पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले. मंगल प्रभात लोढा यांच्या या वक्तव्याने आता राज्यात याचे पडसाद उमटायला सुरूवात झाले आहेत.
येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व 40 आमदारांच्या बंडाशी करून पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. शिवरायांचा इतिहास अपमानित करण्याचे नियोजनबद्ध कारस्थान आज परत एकदा जनतेसमोर आले असल्याची टिका मिटकरी यांनी केली आहे.
“या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
दरम्यान, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद संपेना संपेना तोच आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा आंदोलने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- “ती टिप्पणी प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती”; उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
- देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
- “मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
- “माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा