कोल्हापुर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोल्हापुर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी कोल्हापुरला येऊन महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा येत्या महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याचा नारा दिला. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेबाबत त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं.
येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना आरोग्याचं कारण सांगून भेटत नव्हते. पुढे मुख्यमंत्रीपदावरून दुर झाले आणि सगळीकडे फिरायला लागले. असं का? हा माझा प्रश्न होता. माझी टिप्पणी ही प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती. त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा हीच इच्छा आहे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोग्यावर केलेल्या टिकेला त्यांनी उत्तर दिलं.
“या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
राज ठाकरे यांनी राज्य सरकारवही टिका केली. मंत्रिमंडळातील एक मंत्री, एका महिला नेत्याला शिव्या देतो, असले प्रकार मी महाराष्ट्रात ह्या आधी कधी पाहिले नाहीत. ह्याला माध्यमं पण जबाबदार आहेत. काहीही बडबडलं तरी माध्यमं प्रसिद्धी देतात हे पाहून असल्याना अधिक चेव येतो. त्यामुळे माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागावं. तसेच कोश्यारी हे राज्यपालासारख्या महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत. त्या पदाचा मान राखून मी काही फार बोलत नाही. अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांना काही कमी नाही. पण कधी वाटतं की महत्वाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष व्हावं म्हणून कोश्यारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
“बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत
दरम्यान, त्याचबरोबर राज ठाकरे यांनी बेळगाव सीमावादावरही भाष्य केलं. बेळगाव सीमा प्रश्न हा अचानक कसा वर येतो? जर हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे तर आत्ताच कर्नाटकचे मुख्यमंत्री का बोलले? पंढरपुर, जतवर हक्क सांगणं हे आता का सुरू झालं? कुठल्यातरी महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष वळवून घेण्यासाठी तर हे सुरू नाही ना ? अशी शंकाही राज ठाकरे यांनी उपस्थित केली.
Read also
- देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
- “मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
- “माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा
- रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी