नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये सक्रीय नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादात पक्षाचे खासदार कपिल सिब्बल यांनी नेतृत्वाला काँग्रेसला दीड वर्षापासून अध्यक्ष नाही, अशी जाणीव करून देऊन प्रश्न विचारला आहे – अशी कुठली पार्टी चालते?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणले – मला पक्षाध्यक्ष रहायचे नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितल्यापासून आतापर्यंत काँग्रेसला अध्यक्ष नाही. या गोष्टीला साधारणपणे दीड वर्ष झाले आहे. एखादा पक्ष दीड वर्ष नेत्याशिवाय चालू शकतो? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही माहीत नाही की त्यांना भविष्यात नेमके काय करायचे आहे, कुठे जायचे आहे!
निवडणुकांमध्ये पक्षाच्या नुकत्याच झालेल्या पराभवाबद्दल ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या निवडणुकीवरून लक्षात येते की उत्तर प्रदेश शिवाय, जेथे काँग्रेस फॅक्टर नव्हता, एवढेच काय, गुजरात आणि मध्य प्रदेशातही, जिथे काँग्रेसची भाजपासोबत थेट लढत होती, काँग्रेससाठी निकाल अत्यंत खराब राहिला.
गुजरातमध्ये आमचा सर्व आठही जागांवर पराभव झाला. ६५ टक्के मते भाजपच्या खात्यात गेले. या काँग्रेसमधील पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनी रिक्त केलेल्या जागा होत्या. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमुळे सर्व २८ जागा रिक्त झाल्या होत्या. काँग्रेसला यापैकी केवळ आठ जागाच जिंकता आल्या, असे सिब्बल म्हणाले.
Read Also :
‘त्यांचं वक्तव्य एकूण मला ‘या’ मित्राची आठवण झाली’, रोहित पवारांनी उडवली चंद्रकांतदादांची खिल्ली
…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर : मंत्री रामदास आठवले
‘शेतातल्या ढेकळाने स्वतःची तुलना हिमालयाशी करू नये’, अमोल कोल्हेंचा चंद्रकांतदादांना टोला
‘पुणेकरांनो काळजी घ्या’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, देवेंद्र फडणवीसांनी डागली टीकेची तोफ
मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता!