अमरावती : आमच्या नेत्याचा बॅनर फोटो का नाही? असा जाब विचारत काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच गोंधळ केला. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली आहे. महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ आहे. या सरकारचा कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. तर तीन पक्ष एकमेकाचे नॅचरल अलायन्स नाही. हे नैसर्गिक मित्र नसल्यानं असंच होत राहील, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्यात उद्या, सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय हा फार गांभीर्याने घेतला गेला पाहिजे. शिक्षकांची कोरोना चाचणी ही राज्य सरकारने आपल्या खर्चाने केली पाहिजे. सोशल डिस्टन पाळलं जात की नाही याचाही विचार केला पाहिजे. कारण पालक फार घाबरलेले आहेत. हा निर्णय सरसकट होऊ शकत नाही, असेही राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत बोलतांना सांगितलं.
नेमकं काय झालं सोलापुरात?
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. पण, स्थानिक पातळीवर तिन्ही पक्ष कुठे एकत्र येत आहे, तर कुठे धुसफूस पाहण्यास मिळत आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्यासमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.
सोलापूर शहरात पदवीधर आणि शिक्षक आमदारकीच्या निवडणूक प्रचार सभेचं आयोजन करण्यात आले होते. या प्रचार सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. तसंच, उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रय भरणे इत्यादी मंत्रीही हजर होते. महाविकास आघाडीची सभा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पण, अचानक या सभेत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला.
Read Also :
मुंबई महापालिका निवडणूक : आघाडीतील ‘हा’ पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता!
पाठीत खंजीर खुपसण्यासारख्या गोष्टी आमच्या पक्षात नाही, ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीला टोला
…तर एकाही मंत्र्याला जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, बोंडअळीच्या प्रश्नावरुन भाजप आक्रमक
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या ‘या’ उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी