सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भरवशाचा नाही. त्यांचं सकाळी एक राजकारण असतं आणि रात्री दुसरंच राजकारण असतं. एक वेळ काँग्रेस परवडली. काँग्रेस नेते वेल कल्चर आहेत. ते दरोडेखोर नसतात. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीच्या सलगीला भूलणार नाही, असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे.
भाजपला पुन्हा एक धक्का; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
पुढे बोलताना ते म्हणाले. आज पदोपदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. ते म्हणायेच खोटे बोलू नका. मात्र, हे सरकार प्रत्येक ठिकाणी खोटे बोलत आहे. त्यामुळे क्रांती रेडकर असेल किंवा मी आम्हाला बाळासाहेबांची आठवण येणे साहजिकच आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ. आतापर्यंत राज्यात एसटीच्या 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचे पोपट असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आधी म्हणाले वाझे भाजपचे पोपट आहेत. नंतर हायकोर्टपण म्हणतील. कारण हायकोर्टाने जामीन दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी लिहिलेली घटना सरकारला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करत राहावेत, असं ते म्हणाले. तसेच एका मंत्र्याच्या जावयाला 1500 कोटींचं कंत्राट मिळालं होतं. ते रद्द करावं लागलं. हे किरीट सोमय्या आणि भाजपचं यश आहे. 500 कोटी रुपये या कर्मचाऱ्यांना दिले असते तरी कर्मचारी खूश झाले असते. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी दिलासा देता आला असता, असा चिमटाही त्यांनी काढला.
Read Also :
- राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना टोला
- कोण हा शाहरुख खान आणि त्याचा मुलगा? चंद्रकांत पाटलांचा सवाल
- बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
- आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
- लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या – भाजप