मुंबई : इंधन दरवाढ करायला सुरुवात केली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढते ते आपल्या भल्यासाठी आहे. चांगल्या हेतूने इंधन दरवाढ होत आहे. ते आपण लक्षातच घेत नाही, असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. आज ते एमएमआरडीएच्या कार्यक्रमात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गाजर वाटप करुन गेले असतील – आदित्य ठाकरेंचा निशाणा
”रस्ते खड्डेमुक्त असले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी असायला पाहिजे. मेट्रोची स्टेशन अप्रतिम आहेत. विश्वासच बसत नाही की हे मेट्रोचे स्टेशन मुंबईतील स्टेशन आहे. अशा मेट्रो आल्या तर मेट्रोमधून प्रवास करायला नक्की आवडेल. सर्वजण उशिर झाला तर वाहतूक कोंडीचं उत्तर दिलं. पण, आपण वाहतूक कोंडीचा एक भाग आहोत हे कळत नाही, असेही ते म्हणाले.
पुण्यातील नगरसेवकांची संख्या आता १७५ होणार; पिंपरी चिंचवडला ११ नगरसेवक वाढणार
”कलानगरचं काय झालं. आजूबाजूची वस्ती वाढत चालली आहे. कलानगरचा महामार्ग होता तोच आम्हाला माहिती होता. आता त्या महामार्गाला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असं रुबाबदार नाव देण्यात आलं आहे. आमच्या लहानपणी इतकी वाहतूक कोंडी नव्हती”, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सार्वजनिक वाहतुकीची सोय असताना प्रवासी का येत नाही? हा देखील प्रश्न आहे. आपण आपल्या गरजा वाढवत आहोत. त्याचा पाठपुरवठा करणे गरजेचे आहे. त्याचं नियोजन करणे गरजेचे आहे. रस्त्यामुळे आणखी श्रीमंती वाढणार आहे. पण रस्त्याच्या श्रीमंतीमुळे रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नये, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर रस्ते चांगले बांधले लोक फिरायला येणार नाहीत का? असं मुख्यमंत्री म्हणाले.
Read Also :
- भाजपला पुन्हा एक धक्का; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
- क्रांती रेडकर यांनी जपून बोलावं, इतिहास बाहेर काढला तर…; जितेंद्र आव्हाड यांच सूचक वक्तव्य
- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!
- अजित पवारांना पुन्हा धक्का; मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी
- पुण्यातील भाजप नगरसेवकासह चार जणांवर गुन्हा दाखल; ‘त्या’ प्रकरणाने उडाली खळबळ