मुंबई : सध्या महाराष्ट्रात एक सामना चांगलाच रंगला आहे. तो आहे नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर जाऊन छापा मारला. त्यावेळी त्यांनी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह आठ जणांना अटक केली. त्यानंतर काही दिवसातच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB ने हे सगळा बनाव रचल्याचा आरोप केला होता. आता हे सगळे आरोप व्यक्तीगत पातळीवरही होत आहेत. समीर वानखेडे यांनी धर्म बदलला का? त्यांनी पहिलं लग्न कसं केलं? दाऊन वानखेडे असं त्यांच्या वडिलांचं नाव आहे. असे सगळे आरोप नवाब मलिक यांनी केले. त्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकरने टीका या आरोपांना उत्तर देण्यास सुरूवात केली. ज्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
विलासराव देशमुख यांच्या परिवारातील साखर कारखान्यांचे घोटाळे लवकरच बाहेर काढणार – किरीट सोमय्या
अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर इतिहास काढला तर लक्षात येईल की हमाम में सब नंगे है. मला याचं आश्चर्य वाटतं की, ४००० जणांच्या क्रूझपार्टीमध्ये फक्त सहा जण मिळतात. त्यातील तीन हजार ९९४ जणांना सोडून दिले जाते. सहा ग्रॅम अमली पदार्थासाठी पकडले जाते आणि ३००० किलो सापडल्यावर चर्चाही होत नाही. बरीच माहिती उघड होऊ शकते. क्रांती रेडकरांनी आरोप करताना सांभाळून बोलावं एवढंच मी त्यांना सांगेन. आर्यन खान हा शाहरूख खानचा मुलगा आहे हा एवढाच त्याचा दोष आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जलयुक्त शिवार योजनेला क्लीन चिट मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
नवाब मलिक यांची गुंडागर्दी सुरू झाली आहे. आपल्याला ते करत असलेल्या आऱोपांवरून हेच दिसतं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते आणखी काहीही आरोप करू शकतात. त्यांचं काम तेच आहे. त्यांनी सांगितलं होतंच की ते समीर वानखेडेंना खुर्चीवरून हटवणार त्यासाठीच त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडून नवे आरोप झाले तरी आश्चर्य वाटणार नाही असं म्हणत क्रांती रेडकरने म्हणजेच समीर वानखेडे यांच्या पत्नीने नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.
Read Also :
- राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!
- अजित पवारांना पुन्हा धक्का; मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी
- पुण्यातील भाजप नगरसेवकासह चार जणांवर गुन्हा दाखल; ‘त्या’ प्रकरणाने उडाली खळबळ
- पुण्यातील नगरसेवकांची संख्या आता १७५ होणार; पिंपरी चिंचवडला ११ नगरसेवक वाढणार
- देवेंद्र फडणवीस इकडे येऊन गाजर वाटप करुन गेले असतील – आदित्य ठाकरेंचा निशाणा