औसा : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकऱणाला अवास्तव महत्त्व देत ठाकरे सरकारने अजित पवारांच्या नातेवाईकांवरील आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही प्रश्न लोकांच्या जिव्हाळ्याचे आणि महत्त्वाचे असताना त्यावरुन आपली कोंडी होऊ नये. यासाठी या सरकारने आर्यन प्रकरण एवढे उचलून धरले. असा घणाघाती आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी औशात केला.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण!
चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोण हा शाहरुख आणि त्याचा मुलगा. महाराष्ट्रातील कोट्यावधी लोकांपैकी एक माणुस. पण त्याला आणि त्याच्या मुलाला वाचविण्यासाठी जो या सरकारने आणि त्यांच्या मंत्र्यांनी आकाश पाताळ एक केले. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांंच्या मुळ प्रश्नाला बगल दिली गेली. केंद्रीय तपास यंत्रणांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर, कार्यालयावर टाकलेल्या धाडीत काय सापडले? मराठवाड्यातील शेतकरी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झाला.
क्रांती रेडकर यांनी जपून बोलावं, इतिहास बाहेर काढला तर…; जितेंद्र आव्हाड यांच सूचक वक्तव्य
त्याला आधार मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी पसरत असताना लोकांच्या या आघाडी सरकारचा नाकर्तेपणा लक्षात येऊ नये म्हणुन आर्यन खान प्रकरण सगळीकडे उठविले. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पिके वाहून गेली. अकरा लाख हेक्टर क्षेत्रावरची माती वाहून गेली. अजुन शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. फडणवीस सरकार असतांना सत्तेत असणारे हेच लोक बेंबीच्या देठापासून ओरडत होते की नुकसान झालेल्यांना हेक्टरी पंचवीस हजाराची मदत द्या म्हणुन आता तेच दहा हजार रुपयांची मदत जाहीर करीत आहेत. २०१९ मध्ये आम्ही जाहीर केलेले पॅकेज शेतकरी आता मागत आहेत. ते ठाकरे सरकारने द्यावे. महिलांवर वाढते अत्याचार या सरकारचे अपयश असल्याची टीका करुन ते पुढे म्हणाले की, वाझे प्रकरणात हे सरकार वाझेंची पाठराखण करीत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी वाझेंचा आणि या सरकारचाही खरा चेहरा जगासमोर आणला.
Read Also :
- बहुजन विकास आघाडीला धक्का; 3 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्षही गळाला
- आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – नवाब मलिक
- लाडक्या आर्यनला बेल मिळाल्यानं NCP, शिवसेनेचा जीव भांड्यात पडला; आतातरी जनतेच्या प्रश्नाकडं लक्ष द्या – भाजप
- पेट्रोल डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
- भाजपला पुन्हा एक धक्का; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये करणार प्रवेश