राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, शशी थरूर आदी २३ काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता राज्यातील काँग्रेस आमदार आणि कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेस मंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
गांधी कुटुंबीयांच्या नेतृत्त्वक्षमतविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या स्वपक्षीयांवर काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी पुन्हा एकदा आगपाखड केली आहे. मी यापूर्वी व्यक्त केलेल्या मतावर अजूनही कायम आहे. काही विद्वान नेत्यांनी पत्रातून आपले व्यक्त केले. ज्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी ही भूमिका घेतली आहे, त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना राज्यात फिरून देणार नाही. मी केवळ बोलत नाही तर कृतीही करून दाखवतो, असा इशाराच सुनील केदार यांनी दिला.
I wholeheartedly support Hon. Sonia Gandhi ji as president. Its shameful on Mukul Wasnik, Prithviraj Chavhan and Milind Deora to raise questions on leadership of Gandhi family. These leaders must apologies for their act immediately. Otherwise Congress workers will see how they
— Sunil Chattrapal Kedar (@SunilKedar1111) August 23, 2020
राजीव सातव यांनी देखील लिहिले पत्र
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांनीही सोनिया गांधी यांना पत्र लिहून या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. या पत्रात सातव यांनी सोनियांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत आहात, हे आम्हाला माहिती आहे. तरीही तुम्हीच पक्षाचे नेतृत्त्व करावे, ही आमची नम्र विनंती आहे.
त्याउलट अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांनीच पक्षाची धुरा हातामध्ये घेऊन नेतृत्व करावे अशी मागणी केली आहे. मात्र पक्ष नेतृत्वाच्या मागणीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये जणू उभी फुटचं पडल्याचे दिसून येत आहे.