दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानं जी जागा रिक्त झालीय, त्याच जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी देण्यात येईल. जुलै 2024 पर्यंत त्याची टर्म आहे. विशेष म्हणजे याच जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे या काँग्रेस नेत्यांच्या नावाचीही चर्चा आहे.
काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले आहेत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं कळलं होतं..
“तत्वतः म्हणजे काय? हे मला अजूनही कळलं नाही” अजित पवारांचा फडणवीसांना विकासकामावरून टोला
तसेच राज्यसभेचे खासदार असताना राजीव सातव यांचं कोरोनानं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं. राज्यात शरद रणपिसेंचं निधन झालं, त्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त आहे. ह्या दोन जागांपैकी एका जागेवर प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. आधी तर त्यांना राज्यसभेवरच घेतलं जाईल अशीही चर्चा रंगली. पण त्यांचा अनुभव पहाता त्यांना विधान परिषद मिळेल यावरच भर दिला गेला. आणि आता त्याच चर्चेनुसार प्रज्ञा सातव यांची आमदारकी जवळपास निश्चित मानली जातेय. पण काँग्रेसचं राजकारण हे शेवटपर्यंत धक्का देणारं असतं, त्यामुळे काहींना कहानीत ट्विस्ट येईल असं वाटतं. तर राजीव सातव यांचे गांधी कुटुंबियांशी असलेले संबंध पहाता, प्रज्ञा सातव यांच्याविरोधात कुठलीच खेळी यशस्वी होणार नाही आणि त्या विधान परिषदेवर जातील असं काँग्रेसच्या गोटातून निश्चितपणे सांगितलं जात आहे.
जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले
राजीव सातव यांच्या निधनानंतर काही महिन्यातच प्रज्ञा सातव ह्या मुलासह गांधी कुटुंबियांच्या भेटीला गेल्या. निमित्त होतं मुलाला मिळालेलं भरघोस यश. राहुल गांधी, प्रियंका गांधींची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनीही सातवांच्या मुलाचं कौतूक केलं. कोरोनाच्या खडतर काळात वडीलांचं निधन आणि त्यात मुलानं मिळवलेलं यश कौतुकास्पदच. काँग्रेस नेत्यांनीही त्याची जाण ठेवली. गांधी भेटीनंतरच प्रज्ञा सातव राजकारण सक्रिय होणार याची चर्चा सुरु झाली होती.
Read Also :
- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मावळली; अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली
- ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची – आशिष शेलार
- काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
- अरे शहाण्या तू आमदार आहेस; मास्कवरुन अजितदादांच्या रोहित पवारांना भर सभेत कानपिचक्या
- संघ आणि भाजपला सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन