मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गेल्या आठवड्यापासून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपाचारावेळीच त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहास होते. सोमवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी आणले असून नागरिकांची अंत्यदर्शनासाठी गर्दी होत आहे.पर्वती पायथा निवासस्थानी 8 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यात डॉ. अतुल भोसले यांची सहकाराची ताकद आजी आणि माजी सहकार मंत्र्यांचे भवितव्य ठरवणार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, बाबासाहेब आज आपल्यात नसलेत तरी इतिहासाच्या पानापानावर ते दिसतील. इतिहास कसा सांगावा, कसा पोहोचवावा याचा ते आदर्श परिपाठ होते. बाबासाहेब आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचं नातं जिव्हाळ्याचं होतं, बाळासाहेब ज्यांच्या पायाला स्पर्श करायचे अशा मोजक्या लोकांमध्ये बाबासाहेब होते. दोघांनाही इतिहासाचं वेड होतं, बाबासाहेब इतिहास सांगायचे आणि बाळासाहेब इतिहास घडवायचा प्रयत्न करत होते असं म्हणत बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी संजय राऊत यांनी सांगितल्या.
बाळासाहेब ठाकरेंची अंत्ययात्रा शिवाजी पार्कला पोहचली. तेव्हा एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बाबासाहेब एका खिडकीत उभा होते. जेव्हा अंत्ययात्रा समोर आली तेव्हा भावनाविवश होऊन त्यांनी श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेबांचा स्मृतीदिन दोन दिवसांवर आला आहे आणि त्याआधीच बाबासाहेबांचं जाणं हा एक योगायोग असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं.
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कार्यकर्त्यांची धरपकड सुरू, आलिशान गाड्याही जप्त
बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते. ते पुण्यात पुरंदरेवाड्यात पोहोचले आहेत. राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अंतिम दर्शन घेतले. बाबासाहेबांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी, काम, लिखाण, साहित्य अनेक पिढ्यांसाठी जिवंत राहिल अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.
शतायुषी शिवऋषीला मुकलो – मोहन भागवत
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. आपण एका शतायुषी शिवऋषीला मुकल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांची भक्ती निष्ठेने चालवली असेही भागवत यांनी म्हटले. शिवशाहीर बाबासाहेबांचे पार्थिव जरी दृष्टीआड झाले तरी त्यांचे आयुष्य पिढ्यानपिढ्या शिवरायांचा प्रताप व प्रेरणा सतत जागृत ठेवील अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
साहित्य, कला क्षेत्रातील अर्ध्वयू गमावला – शरद पवार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Read Also :
- परळीची जनता हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं – पंकजा मुंडे
- ही लढाई एसटी कर्मचाऱ्यांची लढाई नाही, ही लढाई समाजाला न्याय देण्याची – आशिष शेलार
- काँग्रेसने मित्र पक्षापासून सावध राहावे; नाना पटोलेंच्या मनात राष्ट्रवादीबद्दल सल?
- अरे शहाण्या तू आमदार आहेस; मास्कवरुन अजितदादांच्या रोहित पवारांना भर सभेत कानपिचक्या
- संघ आणि भाजपला सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करा; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन