मुंबई : काही दिवसांपूर्वी करोनाचा उद्रेक झालेल्या मुंबईतील परिस्थिती गेल्या दोन दिवसांमध्ये काहीशी नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. किशोरी पेडणेकर यांनी एक व्हीडिओ प्रसिद्ध करुन म्हटले की, मुंबईत आता करोना रुग्णांचा आकडा बऱ्यापैकी आणि हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकाने लस घेतली पाहिजे. लस घेतलेल्यांना करोना झाला तरी तो सौम्य असतो. फेब्रुवारी २०२१ पासून आजपर्यंत करोनामुळे जितके मृत्यू झाले आहेत, त्यापैकी ९४ टक्के नागरिकांनी करोनाची लस घेतली नव्हती. त्यामुळे मी प्रत्येकाला करोना लस घेण्याचे आवाहन करते, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे – राजेश टोपे
एकीकडे राज्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस व बुस्टर डोस मिळायला सुरुवात झाली असतानाच महाराष्ट्रात करोना लशीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या खूपच जास्त असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील ९८ लाख नागरिकांनी आतापर्यंत करोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य आहे.
“मुख्यमंत्रीजी, तुम्ही फक्त शाळा सुरु करा, आम्ही काळजी घेतो”; पाचवीच्या विद्यार्थ्याचे पत्र
परंतु, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येचा एक मोठा टप्पा लसीकरणापासून दूर राहिल्याचेही स्पष्ट झाले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी करोना लस घेतलेली नाही. काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
Read also:
- पुणे महापालिका निवडणूक लांबणीवर पडण्याची जोरदार चर्चा…
- दिलासादायक बातमी: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या घटली, गेल्या दोन दिवसात १० टक्यांनी घट
- राष्ट्रवादीची वाटचाल देशपातळीकडे; उत्तरप्रदेश, मणिपूरसहित गोव्यातही निवडणूक लढवणार
- “फडणवीस गोव्यात गेल्यानंतर भाजप पक्ष फुटला”; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका
- प्रताप सरनाईकांच्या इमारतीचा दंड माफ करण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव; भाजप नेते आवाज उठवणार?