मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. यामध्ये दिल्लीतील सात जागांसाठी मतदान होत आहेत. अशातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी सकाळीच मतदानाचा अधिकार बजावला आहे. अशातच आता केजरीवाल यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?
अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता, अमित शाह २०१९ मध्ये म्हणाले होते की, आम्ही ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नेत्यांना निवृत्त करत आहोत. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वत: हा नियम लागू केला होता.
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
ज्यामध्ये असं म्हटलं होतं की वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पक्ष (भाजपा) आणि सरकारमध्ये कोणाचीही जबाबदारी दिली जाणार नाही. या कारणामुळेच अडवाणीजी (लालकृष्ण अडवाणी) आणि मुरली मनोहर जोशीजी निवृत्त झाले. सुमित्रा महाजनजी त्यानंतर निवृत्त झाल्या होत्या, त्यामुळे ते स्वतः हा नियम पाळतील. सध्या उत्तराधिकारी याबाबत पक्षांतर्गत भांडण सुरू आहे. पंतप्रधानांनी एक एक करून सर्व नेत्यांना बाजूला केलं आहे. शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे, खट्टर साहेब आणि डॉ. रमण सिंह यांना हटवण्यात आलं आहे. उरले फक्त योगीजी. निवडणुकीनंतर त्यांनाही हटवण्यात येणार असल्याच्या अफवा आहेत. असेही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला