मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यातील किनारपट्टी भागाचे नुकसान झाले असून, वादळाचा सर्वात जास्त फटका हा महाराष्ट्र, दीव-दमण, गुजरातला बसला, मात्र पंतप्रधान मोदींनी केवळ गुजरातला झालेल्या नुकसानीचा हवाई आढावा घेऊन, नुकसानभरपाईसाठी १००० कोटींची मदत जाहीर केली. यावरून राज्यातल्या आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांनी पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला होता.
दरम्यान, राज्यातही मोठ्या प्रमाणावर नागरिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे गुजरातला मदत जाहीर केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रालाही मदत करावी, अशी विनंती राज्य सरकारकडून केंद्राला केली. मात्र, अजूनही केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झाली नसून, आज मुंबईमध्ये एमएमआरडीएनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरून पंतप्रधान मोदींवर परत एकदा निशाणा साधला आहे.
“रामदास आठवले आम्हाला म्हणाले, “केंद्राकडून कुठली मदत हवी असल्यास मला कळवा”, माझी रामदासजींना हीच विनंती आहे, “तुम्ही तर केंद्रात आहात, एकदा पंतप्रधान मोदींना आठवण करुन द्या, तौत्के चक्रीवादळाचा फटका बसल्यावर मोदींनी फक्त गुजरातचा दौरा केला आणि १ हजार कोटींची मदत जाहीर केली, पण ते महाराष्ट्रात का आले नाहीत? यामागचं कारण अजूनही कळलेलं नाही,” असं पवार म्हणाले.
तसेच, त्यांनी गुजरातला हजार कोटी दिले, निदान महाराष्ट्राला तुम्हाला योग्य वाटत असतील तेवढे तरी द्या, असा माझा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवा,” असा टोला देखील त्यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईवरून मोदींना लगावला.
Read Also :
- “विरोधकांकडे निवडणुकीसाठी कोणताच मुद्दा नसल्याने विरोधक गोंधळात” अतुल भोसले
- कृष्णाचे मनोमिलन अंतिम टप्प्यात ; ३ जून आधी निर्णय न झाल्यास होणार तिरंगी लढत
- ‘मी कोविडयोद्धा म्हणून बाहेर पडावसं वाटत असेल, तर माझ्या ५ मागण्या आधी पूर्ण करा’
- आरक्षणासाठी OBC जनगणनेची आवश्यकता नाही – देवेंद्र फडणवीस
- ‘आरक्षणप्रश्नी कोणासोबतही चर्चेला तयार, फक्त समोरच्यांनाही एकच सूचना…’