दौड : आजच्या दिवशी राज्यातील सर्वच बडे नेते शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची विचारपुस करण्यासाठी गेलेले आहेत तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोलापूर मधील यावेळी ते सांगवी, अक्कलकोट येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन केले. नुकसानाबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
राज्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट आलं असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी आलं नाही असं सकंट राज्यावर आलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.
दौंड तालुक्यातल स्वामी चिंचोली या गावातील नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. यावेळचे बरेचसे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस तसेच प्रवीण दरेकर स्वतः पाण्यामधून जातानाचे दृश्य पाहायला मिळत आहे. यावेळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः फडणवीस हे चिखल तुडवत गेल्याचे समजते अतिवृष्टीमुळे दौड तालुक्यात किती नुकसान झाले आहे याची पाहणी यावेळी त्यांनी केली आणि स्थानिकांशी संवाद साधला.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीत राज्य सरकार काय करणार आहे हे स्पष्ट सांगावे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको आहे. राज्य शासनाचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकारचा बचाव करण्याचं एकमेव काम ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उरलं आहे, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.