पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरून आता पुण्याचं राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. अशातच आता पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणासंदर्भात धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांवर धक्कादायक आरोप देखील केले आहेत.
ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली, असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची कोठडी दिली आहे. हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेलं यश आहे. परंतु या प्रकरणात आवाज उठवला नसता तर हे प्रकरण दाबले गेले असते. अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केलीय.
तसेच आता खरं या व्यवस्थेतील कचरा साफ करण्याची वेळ आलीय. त्याची सुरूवात पोलिस कमिशनर यांच्यापासून करायला हवी. या प्रकरणात इतक्या गंभीर चुका होऊनही कमिशननरने कुणावरही कारवाई केलेली नाहीय. याचाच अर्थ असा होतो की हा गुन्हा दडपण्याच्या डिलमध्ये कमिशनर देखील सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचे तातडीने बदली करण्यात यावी, असेही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय.
हेही वाचा..“तेव्हा तुमचा सागर बंगल्यावरचा बॉस झोपला होता का ?” शरद पवार गटाचा फडणवीसांना खोचक सवाल
यातच या प्रकरणावर संशय घेण्याबाबत काही गोष्टी देखील धंगेकर यांनी सांगितल्या आहेत. १ ) इतक्या गंभीर प्रकरणात पहिली F.I.R दाखल करताना अक्षम्य अश्या चुका करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे कोर्टात आरोपीचा बचाव होऊ शकतो. आरोपीने स्वतः सांगतोय मी दारू पिऊन गाडी चालवली तरी देखील कलम १८५ लपवण्यात आले. तसाच प्रकार ३०४ कलम मध्ये सुद्धा केला.हे कलम जर अगोदर लावले असते तर परवाच त्याचा जामीन नाकारला असता व व्यवस्थेची इतकी बदनामी झाली नसती.
२) कुठल्याही अपघातात त्या कारमधील इतर व्यक्तींची चौकशी केली जाते. या प्रकरणात इतर २-३ व्यक्तींना पद्धतशीरपणे गायब केले आहे. FIR मध्ये त्यांचा साधा उल्लेख देखील नाही. अर्थात यासाठी त्या मुलांचा पालकांकडून वेगळी डिल झाली आहे.
३) राज्याच्या गृहमंत्र्यांनी पहिल्या FIR पासून ३०४ कलम होता हे ठासून सांगितले प्रत्यक्षात पहिल्या FIR मध्ये त्याचा उल्लेख देखील नाही ,याचाच अर्थ पोलीस कमिश्नर यांनी गृहमंत्र्यांची देखील दिशाभूल केली आहे.
हेही वाचा…वायकर जिंकले काय अन् हरले काय ? माझा काय दोष ? गजानन किर्तीकरांच्या विधानाने खळबळ
४) आज या घटनेचा ५ वा दिवस आहे. घटनेच्या तपासात पोलिसांकडून अनेक चुका झाल्या. ज्यामुळे पोलीस प्रशासन आणि पुण्यनगरीच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिले. सर्व व्यवस्थेची बदनामी झाली परंतु तरी देखील अद्याप कोणीही अधिकारी यात निलंबित नाही. याचा अर्थ तपास अधिकाऱ्या पासून ते कमिश्नरपर्यंत सर्व व्यवस्था विकली गेलेली आहे.
५) काल अचानकपणे पुणे शहरातील ४ ते ५ पब आणि रूफटॉप रेस्टॉरंट वर कारवाई करण्यात आली. जर हे सर्व अवैद्य होतं तर ही घटना घडण्याची वाट का पाहिली..? पोलीस कमिशनर इतक्या दिवस त्यांच्या पाकिटावर मेहरबान होऊन त्यांना पब चालविण्याची मुभा देत होते का..? असा सवाल करत विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेची, पोलीस प्रशासनाची बदनामी होईल असे वर्तन करणाऱ्या पोलीस कमिश्नर यांच्याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रचंड रोष आहे. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करण्यात यावी. अशी विनंती देखील त्यांनी व्यक्त केलीय.
READ ALSO :
हेही वाचा..“नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ?”, वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे ?
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?
हेही वाचा..“सरकारी कामात अडथळा आणल्याने टिंगरेंवर गुन्हा दाखल करा”, वंचित बहुजन आघाडीची मोठी मागणी
हेही वाचा…” निवडणुकी आधी बंडखोरी, नंतर स्नेहभोजन,” सांगलीत विशाल पाटलांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
हेही वाचा…“शांत बसण्यासाठी पोलिसांना पैशाची पाकिटं गेलीत ?”रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप