लातूर : मागील काही दिवसांमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल लागला होता. यामध्ये महाविकास आघाडीने एक जागा सोडून सर्वच जागांवर विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. ही निवडणूक काहीशी वादळी ठरली होती. विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे फॉर्म बाद झाल्याने संभाजी पाटील निलंगेकर यांनी हे फॉर्म बाद करण्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून फोन केला गेला होता असा आरोप केला होता.
“..गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…”; आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट
निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष तथा आमदार धीरज देशमुख यांना संधी देण्यासाठी त्यांचे काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी एक पाऊल मागे घेत सामंजस्याची भूमिका घेतली होती. निवडणूक प्रचारात बँकेने पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पीक कर्ज वाटप करणार असा शब्द दिला होता. आता खऱ्या अर्थाने हा शब्द पूर्ण करण्यात आला आहे.
आमच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो ‘म्याव-म्याव’ करत नाही तर ‘डरकाळी’ फोडतो – भाजप
पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने पीक कर्ज वाटप करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत काही दिवसांपूर्वीच मंजूर करण्यात आला होता. आता त्या निर्णयाची अंबलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. पाच लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय शेतकरी बांधवांना जितके समाधान देणारा आहे, तितकेच समाधान बँकेचा अध्यक्ष या नात्याने मलाही आहे, अशा भावना जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष तथा लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी व्यक्त केल्या.
Read also:
- पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
- …तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
- तू आम्हाला टेन्शनमध्ये पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो – नारायण राणे
- ‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला
- ‘शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास?’; सचिन सावंत यांनी शेलारांना डिवचलं