कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील सर्वाधिक रंजक लढतीत बाजी मारलेल्या विठ्ठल देसाई यांच्या विजयाची सकाळपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही कणकवलीतील पत्रकारपरिषदेवेळी ही बाब बोलून दाखवली. पत्रकारपरिषद सुरु होण्यापूर्वी नारायण राणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नेत्यांशी गप्पा मारत होते. त्यावेळी नारायण राणे यांनी विठ्ठल देसाई यांच्याकडे पाहून, जिंकलास, खरं वाटतंय का, असा सवाल विचारला. त्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर राणे म्हणाले की, नशीब ए हा नशीब, चिठ्ठीवर निवडून येणं म्हणजे मोठं नशीब. तू आम्हाला टेन्शनमध्येच पाठवलंस, मी आंघोळ करता करता थांबलो, असे नारायण राणे यांनी सांगितले.
पवारांच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे भाजप-शिवसेनेत अंतर वाढलं, आणि भाजपचा घात झाला.. ते वाक्य कोणतं?
कणकवलीमध्ये सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यात जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी लढत झाली होती. मतमोजणीदरम्यान सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली. त्यामुळे ईश्वरचिठ्ठीच्या सहाय्याने निकाल लावण्यात आला. यामध्ये विठ्ठल देसाई यांचा विजय झाला. सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाचे भरते आले.
“नितेश राणेंना कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजाश्रय?”; संजय राऊत यांनी व्यक्त केला संशय
सतीश सावंत यांच्या पराभवानंतर कणकवलीत राणे समर्थकांनी एकच जल्लोष केला. सतीश सावंत यांनी राणे साहेबांशी गद्दारी केली होती. त्यामुळे देवही त्यांच्या बाजूने नव्हता. परमेश्वराची चिठ्ठही राणे साहेबांच्या बाजूने पडली, अशी प्रतिक्रिया एका राणे समर्थकाने दिली. आता सतीश सावंत यांनी घरी बसावे. राणे साहेबांचा नाद करायचा नाय, नितेश राणे बस नाम ही काफी है, अशा घोषणा यावेळी राणे समर्थकांकडून देण्यात आल्या.
कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
या पत्रकारपरिषदेत नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईत लावण्यात आलेल्या पोस्टर्सविषयी नारायण राणे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर राणे यानी म्हटले की, हे पोस्टर लावायच्याच लायकीचेच आहेत. राज्यकारभार करायच्या लायकीये नाहीत. आता त्यांनी हातात गम घेऊन पोस्टर लावतच फिरावं, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
Read also:
- ‘राजन तेली यांची मोठी मेहनत, खचू नका, जोमानं कामाला लागा‘, फडणवीसांचा सल्ला
- ‘शेलारानू.. अर्ध्या हळकुंडानं पिवळं कित्याक व्हतास?’; सचिन सावंत यांनी शेलारांना डिवचलं
- आमच्या कार्यकर्त्याला कोंडीत पकडल्यावर तो ‘म्याव-म्याव’ करत नाही तर ‘डरकाळी’ फोडतो – भाजप
- “..गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…”; आशिष शेलारांचं मालवणीतून ट्विट
- मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नये; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला घरचा आहेर