मुंबई – राज्याच्या राजकारणात कधीही शक्य नसलेलं सत्तासमिकरण अस्तित्वात आले. शिवसेनेने भाजपला दगा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच त्यावेळचे डावपेच यावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यावेळी त्यांच्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं खुद्द पवार यांनी सांगितलं आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाची परिस्थिती तसेच त्यावेळी काय घडामोडी घडल्या याबाबत पवार यांनी एका मुलाखतीत सांगितलं. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडून धडपड सुरु होती. तर दुसरीकडे शिवसेना मुख्यंत्रिपदावर अडून बसली होती. यावेळी सरकार स्थापन्यासाठी भाजपला बहुमताचा अकडा गाठण्यासाठी गरजचे होऊ लागले. याच गोष्टीचा फायदा घेत शरद पवार यांनी मोठा राजकीय डाव टाकला. याच राजकीय खेळीबद्दल त्यांनी भाष्य केलं. “देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असे मी त्यावेळी म्हणालो होते. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं,” असं शरद पवार यांनी सांगितलं.
महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवल; कालिचरण महाराज यांना अटक
दरम्यान, शरद पवार यांचा राकारणातील अनुभव पाहता ते या क्षेत्रातील चाणक्य आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. त्यांनी मुलाखतीदरम्यान सांगितल्याप्रमाणे त्यांच्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर वाढत गेले. त्यानंतर शिवसेनेची राष्ट्रवादी तसेच काँग्रेससोबत जवळीक वाढली. परिणामी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
Read also:
- इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?
- “तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार”; चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस