पुणे – महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गाजलेल्या शपथविधीवर काही पुस्तके निघाली. यातील महत्वाचे पात्र असलेले फडणवीस त्याविषयी बोलले आहेत. शरद पवार, संजय राऊत हे नेते अधूनमधून यावरच्या आठवणी सांगत असतात. पण या साऱ्या नाट्यात फडणवीसांपेक्षाही प्रमुख पात्र असलेल्या अजित पवार यांना हा विषय मात्र नकोसा वाटतो.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष; नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनातही हा विषय उपस्थित झाला. सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीवरून अजितदादांना समोरून टोमणा मारला. दादांनी अहो, तो शपथविधी पहाटे नाही तर सकाळी आठ वाजता झाला होता, असे अधिकृतरित्या जाहीर करून टाकले. या शपथविधीबद्दल अजितदादांनी अधिकृतरित्या दिलेली ही माहिती एवढीच. या व्यतिरिक्त एकही जादा शब्द ते या संपूर्ण विषयावर गेल्या दोन वर्षांत बोललेले नाहीत.
त्यांचे यावर एकच उत्तर ठरलेले असते. अजित पवार हे यासंबंधीच्या प्रश्नांवर चिडतात, हे अनेकदा अनुभवास आलेले आहे. इतर कोणत्याही विषयावर पत्रकारांच्या प्रश्नांवर भरभरून बोलणाऱ्या अजित पवारांना हा प्रश्न मात्र नकोसा वाटतो. त्यांचे नेहमीचे उत्तर ते चिडक्या स्वरात देतात. ते म्हणजे,”वेळ आल्यावर बोलेन”
तिसरी लाट भयानक रूपात येऊ शकते, कृपा करून निर्बंध पाळा; महापौर पेडणेकरांचे नागरिकांना आव्हान
शरद पवार यांनी काल दिलेल्या एका मुलाखतीत त्यांना पुन्हा या शपथविधीच्या वेळचा प्रसंग विचारण्यात आला होता. “तुम्हीच (म्हणजे शरद पवारांनी) अजितदादांना भाजपकडे शपथविधीसाठी पाठविले होते, अशी चर्चा असते. त्यावर तुमचे मत काय,?” या प्रश्नावर पवारांनी गुगली उत्तर दिले. “मीच अजित पवारांना पाठविले असते तर त्यांनी ते काम अर्धवट ठेवले नसते,” असे सांगून हशा आणि टाळ्या वसूल केल्या. पण त्यातून थेटपणे प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही. मात्र त्या आधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीशी युती करण्याची तयारी दाखवली होती आणि तशी ऑफर यांनी दिली होती, अशी माहिती पवार यांनी दिली. मात्र तो प्रस्ताव नाकारल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पवारांच्या या मुलाखतीनंतर आज पत्रकार परिषदेत अजित पवार यांना पुन्हा याविषयी विचारण्यात आले. त्यांनी चिडलेल्या स्वरात सांगितले की आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याविषयी एकदा भूमिका मांडल्यानंतर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी त्यावर बोलण्याची गरज नाही. मी योग्य वेळ आल्यावर बोलेन!”
Read also:
- “तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार”; चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला
- “नारायण राणे सर्वांना पुरून उरणार आहेत”; चंद्रकांत पाटलांचा राणेंना पाठिंबा
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”