मुंबई – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांचा कार्यकर्ता गोट्या सावंत आणि आणखी एका आरोपीस या संदर्भात अटक करण्यात आली आहे. मात्र नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. या सर्व घडामोडींनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे नागपूर दौरा असताना त्यांनी आपला दौरा आटोपता घेतला आहे. आणि कणकवलीत दाखल झाले
१०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी
त्यानंतर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि त्यांनी नितेश राणे कुठे आहेत मला माहितीये पण मी का सांगू? त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत असल्याचं राणे म्हणाले. नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिस यंत्रणा शोध घेत असतानाच मुलगा कुठे आहे? हे सांगण्यास नारायण राणे यांनी नकार दिला आहे.
माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
त्यानंतर राणे यांना पोलिसांनी नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे सांगितले होते. त्यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. “राणे सर्वांना पुरून उरणार आहेत. नारायण राणे तसेच नितेश राणे यांच्या स्टेरमेंटवर ते कमेंट करत नव्हते. बराच काळ ते बोलण्याचे धाडस करत नव्हते. महाविकास आघाडी सरकार कृत्रिमरित्या आलेलं आहे. लोकांनी त्यांना कौल दिला नव्हता. विद्यापीठ सुधारणा कायदा ज्याप्रकारे समंत करुन घेतला तो नियमांना धरून नव्हता. नारायण राणे यांना नोटीस पाठवणं हा हस्यास्पद प्रकार आहे. पण शेवटी प्रत्येक विषयामध्ये अॅक्शन घेऊन तोंड फोडून घ्यायचं अशीच परंपरा सुरु झाली आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- “संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामागे नितेश राणेच”; विनायक राऊतांचा आरोप
- राणेंना पोलिस ठाण्यात बोलाविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर FIR दाखल करा – देवेंद्र फडणवीस
- “अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती”
- अवघ्या देशाला कोड्यात टाकणाऱ्या ‘त्या’ पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवारांची पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया; म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका