सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वेळी चांगलाच राजकीय राडा महाराष्ट्राला बघायला मिळाला होता. आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष त्यावेळी झाला होता. आमदार गोपीचंद पडळकर यांनी गाडी अंगावर घातल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडून टाकली होती. यावेळी मोठा राडा आटपाडीमध्ये बघायला मिळाला होता. याच प्रकरणावरून आता गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवला आहे.
नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
विधानसभेची २००९ची निवडणूक मी आटपाडी-खानापूर मतदारसंघातून लढवली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला माझ्यामुळं पराभवाचा सामना करावा लागला होता. राष्ट्रवादीच्या त्या उमेदवाराच्या मागे १७ इच्छुकांचा पाठींबा होता मात्र त्यावेळी मी १९ हजार मते पाडली आणि त्याचा पराभव झाला. तेव्हापासून माझ्यावर गुन्ह्यांचे सत्र सुरु झाले असा आरोप यावेळी पडळकरांनी केला आहे.
विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
गृहराज्यमंत्री देसाई यांनी विधान परिषदेत खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे असं देखील पडळकरांनी म्हटलं आहे. मेटकरी नावाच्या सांगली जिल्हा बॅंकेच्या मतदाराला माझा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी ‘आमच्या उमेदवाराला मतदान का करत नाही,’ अशी विचारणा करणारा फोन केला होता, असे देसाई यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
सांगली जिल्हा बॅंकेच्या मतदार यादीत मेटकरी नावाचा एकही सभासद नाही किंवा तशी नोंद नाही . तसेच, ज्याने तक्रार केली आहे, तो जानकर हा खानापूर तालुक्यातील आहे, त्याचा आटपाडीशी काहीही संबंध नाही. मेटकरी यांना सकाळी अकरा वाजता माझ्या भावाने मारले होते, तर त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवालही त्यांनी केला.
Read also:
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान