मुंबई : विधानससभा अध्यक्षांची निवडीतील सुधारणा कायदेशीरच होत्या. त्यामध्ये सरकारने मांडलेली भूमिका योग्यच होती. मात्र, राज्यपालांचे मत वेगळे होते. त्यामुळे सरकारचे बरोबर असूनही राज्यपालांचा सन्मान राखायचा म्हणून आम्ही माघार घेत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळली, असा दावा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
ठाकरे सरकारकडून आता विद्यापीठांनाही राजकारणाचा अड्डा बनवाण्याचा घाट घातला जातोय; फडणवीस आक्रमक
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनासाठी थोरात नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असे चित्र पहायला मिळाले. राज्यपालांकडून नियमांतील सुधारणांना मंजुरी न मिळाल्याने सरकारला अध्यक्षपदाची निवडणूक घेता आली नाही.
अर्धा गुंठा, एक गुंठा जागेवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा – आमदार महेश लांडगे
यासंबंधी विचारले असता थोरात म्हणाले, राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंबंधी केलेली सुधारणा विचारपूर्वकच केली होती. मात्र, राज्यपालांचे त्यासंबंधी वेगळे मत होते. त्यांचा सन्मान राखायचा म्हणून आम्ही ही निवडणूक टाळली. जो बदल केला तो बदल आमच्या मते योग्य आहे. लोकसभेत अशा पद्धतीनेच कामकाज चालते. तेथेही पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफारस करतात, तशीच येथे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली. त्यामुळे आम्हाला वाटते की यात आम्ही काहीच चुकीचे केलेले नाही. मात्र, राज्यपालांना वाटते की घटनात्मक त्रुटी आहेत. त्यामुळे विचारांचे मतभेद झाले आहेत. आमची भूमिका अशी आहे की आम्ही जे केले ते घटनात्मकच आणि योग्य आहे. मात्र, शेवटी राज्यपालांचा सन्मान राखण्यासाठी म्हणून आम्ही थांबलो. शेवटी आम्ही त्यांचा सन्मान राखला हेही लक्षात घेतले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीचे ५० ते ६० आमदार नाराज असल्याने धोका नको म्हणून सरकारने हे बदल केल्याचा आरोप केला होता. त्यासंबंधी विचारले असता थोरात म्हणाले, लोकसभेत, राज्यसभेत आणि देशाच्या अनेक विधानसभांमध्ये ज्या पद्धतीने अध्यक्षांची निवड होते, त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. राज्यसभेचे मतदानही आता खुले केले आहे. पक्षांतरबंदी कायद्यामुळे आता कोणालाही पक्षाच्या विरोधात भूमिका घेता येत नाही. त्यामुळे सगळ्यांनीच ही पद्धत स्वीकारली आहे. त्यामुळे आम्ही काही वेगळे करतो आहोत, असा याचा अर्थ नाही.’
Read also:
- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
- खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
- विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
- नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत; दोन दिवसांत होणार निर्णय