मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ११४९२ आहे. २० जानेवारी दरम्यान, पाच सहा हजार असणारा आकडा आज तब्बल ११ हजारांवर पोहोचला असून, तो २० हजारांवर जाऊ शकतो. मुंबईत २० जानेवारी दरम्यान ३०० केसेस होत्या. आता त्या १३०० ते २२०० पर्यंत पोहोचतील. त्यामुळे ७ पटीने हा दर वाढला आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. रोज २००० च्या पुढे केसेस समोर येण्याची शक्यता असून, या परीस्थितीत काळजी घ्यावी लागणार आहे. निर्बंध वाढवावे लागू शकतात असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
“मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले
मुंबईत बाधित होण्याचं प्रमाण ४ टक्क्यांवर पोहोचलं आहे. दिल्लीत आज सर्व कार्यक्रमांवर निर्बंध आहे, मात्र आपल्याकडे सर्व कार्यक्रम सूरू आहेत. आपल्याला निर्बंध पाळावे लागतील. आपण नियम पाळले नाहीत, तर निर्बंध वाढवावे लागती. मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करून लवकरच हा निर्णय घेतील असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
नितेश राणेंच्या अडचणीत होणार वाढ? कालच्या सत्रात न्यायालायने अंतरिम जामिनाची मागणी फेटाळली
राज्यात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 167 इतकी झाली आहे. त्यापैकी 91 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. ओमायक्रॉन बाधितांपैकी एकाचाही मृत्यू झालेला नाहीये. रुग्ण वाढत असल्याने तो निश्चितच काळजीचा विषय आहे.
Read also:
- मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…
- अर्धा गुंठा, एक गुंठा जागेवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा – आमदार महेश लांडगे
- ठाकरे सरकारकडून आता विद्यापीठांनाही राजकारणाचा अड्डा बनवाण्याचा घाट घातला जातोय; फडणवीस आक्रमक
- यंदाच्या हिवाळी अधिवेशनात २४ महत्वाची विधेयके मंजूर; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
- ज्या गोपीनाथरावांनी तुम्हाला सत्तेत बसवले, तुम्ही त्यांच्याच मुलीला घरी बसवले – आमदार दिलीप मोहिते