मुंबई – जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शिवसेनेकडूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. या प्रकरणी रोहिणी खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे उद्विग्न मनस्थितीतील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना विधानसभेतच रडू कोसळले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मुक्ताईनगरमध्ये 24 डिसेंबरला दोन पक्षांमध्ये वादावादी होऊन पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. घटना समजताच मी मध्यरात्री दोन वाजता मुंबईतून निघालो. दुसऱ्या दिवशी पोहोचल्यावर मी दुपारी बारा वाजता माझ्या नेहमीच्या कामाला लागलो. अडीच ते तीन वाजेच्या सुमारास मला एका मीडियाकर्मीचा फोन आला. त्याने बातमी सोशल मीडियावर टाकली असून पाहण्यास सांगितले. त्यानुसार मी बातमी पाहिली. यात रोहिणी खडसे यांनी मला चोप देण्याविषयी विधान केले होते.
“…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
ते पुढे म्हणाले, हा प्रकार चुकीचा आहे. राज्यात मुख्यमंत्री व गृहमंत्री अतिशय चांगले काम करत आहेत. राज्यात कायद्याचे राज्य आहे. मात्र पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यास विलंब करण्यात आला. 24 डिसेंबरला दोन पक्षांच्या वेगवेगळ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला. त्यामध्ये माझा काही संबंध नाही. तरीही रोहिणी खडसे यांनी 25 डिसेंबरला पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हा आमदाराला चोप देऊ. 26 डिसेंबरलाही त्या त्यांच्या मतावर ठाम असल्याचे एका दैनिकातून कळाले. त्यामुळे राजकीय जीवनात माझ्या मतदार संघात मला फिरता येणार नाही, अशी स्थिती निर्माण केली आहे.
“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय?”; पडळकरांवरील हल्ला प्रयत्नावर फडणवीस विधानसभेत आक्रमक
दोन वर्षांपूर्वी मी निवडून आल्यापासून त्यांची मानसिकता खराब झाली आहे. त्या मला उद्देशुन म्हणाल्या, त्यांचे रेतीचे धंदे आहेत. सट्टा गुजर पत्त्याचे धंदे आहेत. मी सरकारला विनंती करतो की एकाद्या पोलिस अधिकाऱ्याची समिती नियुक्त करून या आरोपांची चौकशी करावी. त्यांनी ओडिओ रेकॉर्डिंगचा आरोप केला होता. ते रोकॉर्डिंगही तपासण्यात यावे. माझे राजकीय आयुष्य संपविण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी त्या गावात एकटा राहतो. माझे तेथे कोणी नात्यागोत्यातील नाही. 30 वर्षांपासून मी राजकारण करतो आहे. खोट्या आरोपात मला अडकविण्याचे षडयंत्र चालले आहे. त्यामुळे माझे राजकीय आयुष्य संपेल. पर्यायाने मला आत्महत्या करावी लागेल, असे म्हणत चंद्रकांत पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले.
Read also:
- “मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?
- अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…
- ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
- “बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
- अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान