मुंबई – विधिमंडळ अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील खडाजंगी आज सोमवारी जोरदार रंगली. त्यात विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले.
विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली, सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप केला होता. त्याचा फोटोही ट्वीट केला होता. शिवाय दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. त्याचे शरद पवार, रोहित पवार यांच्यासोबतचे फोटोही समोर येत आहेत. या प्रकरणाचे आज विधिमंडळात पडसाद उमटले.
फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
पडळकरांवरील हल्ल्यावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस चांगलेच आक्रमक झाले. ते म्हणाले, पडळकर यांच्यावर पोलीस ठाण्यासमोर हल्ला केला. हा हल्ला कसा झाला, हे एका क्लीपमधून समोर आले. विशेष म्हणजे या हल्ल्याचे चित्रिकरण पोलिसांनी केले, असा आरोप त्यांनी केला. मात्र, याप्रकरणी हल्लेखोरांवर कारवाई न करता गोपीचंद पडळकर यांच्यावर कलम 307 लावण्यात आले. हा हल्ला झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्वीटर हँडलवर पडळकरांना कसा धडा शिकवला, असे ट्वीट करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी सारे पुरावे विधानसभा अध्यक्षांना देऊ, असे फडणवीस म्हणाले.
“एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
तसेच याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहिजेत. सरकारचा या घटनेशी थेट संबंध आहे. सत्ता पक्षाच्या बापाचे पोलीस आहेत का? या राज्याचे पोलीस आहेत, असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. राज्यात जे चाललंय ते योग्य नाही. महाराष्ट्राला महाराष्ट्र ठेवा आणि बंगाल होऊ देऊ नका. गोपीचंद पडळकर यांच्यावरील 307 चा गुन्हा मागं घ्या, अशी मागणी यावेळी फडणवीस यांनी केली.
Read also:
- “…खरंतर नवाब मालिकांनी माफी मागितली पाहिजे”; सुधीर मुनगंटीवारांचा घणाघात
- “नितेश राणे चुकीचेच, पण तुम्ही सुद्धा हुप हुप केले होते..”, भास्कर जाधवांच्या मागणीनंतर फडणवीसांचा संताप
- नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
- “सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे