मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच मानेची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी तिरुपती बालाजीकडे पायी प्रवास करत साकडे घालण्यासाठी निघालेल्या कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा वाटेतच मृत्यू झाला.
फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
शिवसेना कार्यकर्ते, माजी नगरसेवक सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा निर्धार केला होता. यासाठी त्यांना एकूण ११०० किमी अंतर पार करायचे होते. ते १ डिसेंबर २०२१ पासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. मात्र तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्युनं गाठलं. बीडपासून तिरुपतीपर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प करणारे ज्येष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे कर्नाटक मधील रायचूर येथे तब्येत बिघडल्याने अचानक निधन झालं. सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा सुरु केली होती. मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कारही केला होता.
“१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
त्यांना यात्रेत अचानक ताप आला होता मात्र त्यांनी तरीही आपली यात्रा संपवली नव्हती. थकवा जास्त आल्याने ते कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. रुईकर यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही”, असं ट्विट शिवसेना नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. रुईकर यांच्या पत्नीने शिवसेना पक्षाकडे मदतीची याचना केली होती. त्यांच्या सर्व खर्चाची जबाबदारी आता ठाणे जिल्हा शिवसेनेकडून घेण्यात येणार आहे.
Read also:
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ
- “एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”