पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार यांची आगेकूच आता शिरूर लोकसभा मतदार संघाच्या दिशेने सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यादृष्टीने मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पार्थ आता २०२४ ची लोकसभा निवडणूक शिरुर लोकसभा मतदार संघातून लढवणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ
पंधरा दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सशर्त परवानगी दिली. शिरुर लोकसभा मतदार संघात राजकीयदृष्टया हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. २०११ पासून बंद असलेली बैलगाडा शर्यतीचा निकाल लागला आणि अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप मोहीते, अतूल बेनके, अशोक पवार या सर्वांचे अभिनंदन केले. बैलगाडा शर्यत हा संपूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी यासाठी प्रयत्न केले होते. मग, केवळ शिरुर मतदार संघातील नेत्यांना श्रेय देवून अजित पवार यांना काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
मावळ लोकसभा मतदार संघातून २०१९ मध्ये पार्थ पवार यांनी निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या मतदार संघामध्ये शहरी भागातील पिंपरी आणि चिंचवड असे दोन मतदार संघ येतात. पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक सक्षम नेतृत्त्वाचा अभाव असल्यामुळे पार्थ पवार ‘बॅकफूट’वर राहिले आहेत. २०२४ मध्ये मावळमधून लढल्यास पुन्हा अनेक आव्हानांचा सामाना करावा लागणार आहे. याचा अंदाज आल्यानंतर आता पवार कुटुंबियांनी पार्थ यांच्यासाठी ‘सेफ’ मतदार संघाची चाचपणी सुरू केली आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी किंवा शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढवणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे नेते आहेत. या दोघांपैकी एकास महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यास एकजण बंडखोरी करणार किंवा अधिकृत उमेदवाराच्या विरोधात छुप्या पद्धतीने काम करुन दगाफटका करणार हे निश्चित आहे. परिणामी, लोकसभेतील हक्काची एक सीट जाण्याची शक्यता आहे.
फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
दुसरीकडे, अमोल कोल्हे यांनी अभिनय क्षेत्रात योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवता येईल. तसेच, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीनदा लोकसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत राज्यात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देता येईल आणि समजूत काढता येईल का? अशी चाचपणी केली जात आहे.
छत्रपती संभाजी महाराज स्मारकाची घोषणा; ‘सेफ मतदार संघा’ची पायाभरणी…
छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या वडू बुद्रूक येथे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शिरुर लोकसभा मतदार संघात असलेल्या या समाधीस्थळाच्या विकासामुळे संपूर्ण राज्यातील शंभूप्रेमींना साद घातली जात आहे. दुसरीकडे, बैलगाडा शर्यतीचा लढा शिरुर लोकसभा मतदार संघातूनच जीवंत राहिला. याही मुद्यावर अजित पवार यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. तसेच, इंद्रायणी मेडिसिडी सारखा प्रकल्प हाती घेवून शिरुरमधील विकास प्रकल्पांबाबत राष्ट्रवादीचे ब्रँडिंग सुरू झाले आहे. कार्यकर्ते जोडणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी नियोजन केले जात असून, खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रसिद्धीचा फायदा घेत, पार्थ पवार यांना शिरुरमधून ‘सेफ’ लोकसभेत पाठवण्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
पार्थ पवारांसाठी शिरुरचा मार्ग मोकळा…
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभा मतदार संघातील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वढू येथे स्मारक उभारण्याची घोषणा केली. तसेच, कोल्हे यांच्या मागणीनुसार सुमारे ३१ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केला. शिरुर मतदार संघातील सहाही मतदार संघात पवार कुटुंबियांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. रस्ते विकासाच्या माध्यमातून पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा केला जात आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.
मोहिते, लांडे यांच्या नाराजीमागे अजित पवार?
खेडचे आमदार दिलीप मोहिते आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे, खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या चौकटीतील नेते आहेत. त्यामुळे लांडे आणि मोहिते अजित पवार यांच्या मर्जीशिवाय ब्र-अक्षरही काढणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, वेळोवेळी लांडे आणि मोहिते यांनी कोल्हे यांच्यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे. खासदार कोल्हे यांनीही खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करुन मोहीतेंना आणि नगरसेवक अजित गव्हाणे यांना हाताशी धरुन लांडे यांची ‘नाकाबंदी’ केली आहे. परिणामी आगामी काळात कोल्हेंविरोधातील सूर वाढणार असून, पर्यायाने कोल्हे यांना स्पर्धेतून बाहेर ढकण्यात येईल, असे संकेत आहेत.
Read also:
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ
- “एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
- “१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा