नवी दिल्लीः मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त विधान केलंय. जीन्स घालणाऱ्या मुलींना पीएम मोदी आवडत नाहीत. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव आहे, जीन्स घालणाऱ्या मुलीवर मोदींचा प्रभाव नाही, असंही वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केलंय. सावरकर आणि हिंदुत्वाबाबतही दिग्विजय सिंह यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव आलं असेल; किशोरी पेडणेकरांची खोचक टीका
खरं तर शनिवारी जनजागरण मोहिमेदरम्यान दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना जीन्स आणि मोबाईल फोन परिधान करणाऱ्या मुलींवर मोदींचा प्रभाव नाही, फक्त 40 ते 50 वयोगटातील महिलांवर मोदींचा प्रभाव असल्याचे म्हटले होते. 2024 मध्ये मोदी पुन्हा विजयी झाले, जर भाजप जिंकला तर प्रथम भारतीय राज्यघटना बदलली जाईल. आरक्षण संपेल, जे मिळत असेल ते संपेल. कारण ते रशिया आणि चीनचे मॉडेल फॉलो करतात, असंही दिग्विजय सिंह यांनी सांगितल.
फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, “मध्य प्रदेशात बजरंग दलाचे सर्वाधिक गुंड आहेत. पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांची हत्या झाल्याचे त्यांनी सांगितले. खून करणाऱ्याला तुम्ही नोकरी दिली. भाजप बजरंग दलाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे मोदींचे सरकार आहे. शिवराज मामू यांची वाळू माफिया टोळी आहे, त्यांच्याविरोधात आता लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
Read also:
- एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
- नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं ‘ते’ पद घेतलं काढून…
- “खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
- “आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!”
- ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, असे असतील नवे निर्बंध..!