पिंपरी चिंचवड : बैलगाडा शर्यतीचा लढा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वात लढण्यात आला. बंद पडलेल्या राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी तात्पुरती उठवीत सर्वोच्च न्यायालयाने या महिन्याच्या १६ तारखेला सशर्त परवानगी दिली. त्यानंतर आपलीच बारी पहिली असल्याचा दावा शिवसेना उपनेते व `शिरूर`चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील आणि मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. दुसरीकडे न्यायालयात बंदी उठवण्यासाठी लढा देणारे भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे आणि मावळचे माजी भाजप आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी ही शर्यत भरविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे श्रेयवादाच्या लढाईचा कलगीतुरा रंगाल्याचे चित्र दिसून येत आहे.
बैलगाडा शर्यतीला परवानगी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून महेश लांडगेंचे तोंडभरून कौतूक
दरम्यान, बैलगाडा हा आमचा (शेतकऱ्यांचा) अतिशय पारंपारिक खेळ आहे. 2014 साली न्यायालयाने ही बंदी टाकली. आमचे म्हणजेच फडणवीस सरकार राज्यात आल्यावर मी स्वत: यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्त्वात एक शिष्टमंडळ सुद्धा केंद्र सरकारकडे घेऊन गेलो. तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढले आणि ही शर्यत पुन्हा सुरू झाली. परंतू न्यायालयाने त्यावर पुन्हा बंदी आणली. अखेर 2017 मध्ये आम्ही एक कायदा तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून शर्यत सुरू केली.‘रनिंग अॅबिलिटी ऑफ बुल’म्हणजेच बैल हा धावणार प्राणी आहे, असा शास्त्रीय अहवाल दोन महिन्यात तयार केला. त्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एक समिती तयार केली. आजचा निर्णय हा त्या अहवालाला स्वीकृत केल्यानंतर आला आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर दुसरीकडे खासदार कोल्हे आणि माजी खासदार आढाळराव पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरवठा केल्याचे बोलले जाते. त्यामुळे, नेमके श्रेय कोणाचे यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
शेळकेंनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत ही तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार आहे. तर, आढळरांवांच्या या शर्यतीचा धुराळा त्यांच्या गावात (लांडेवाडी-चिंचोडी,ता.आंबेगाव,जि.पुणे) येथे उडणार आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर प्रथम आपणच ही शर्यत आय़ोजित केल्याचा दावा या दोघांनीही केला आहे. मात्र, या दोघांही आयोजकांपुढे २५० पेक्षा अधिकजणांची गर्दी घाटात होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या २६ अटींचे पालनही त्यांना करावे लागणार आहे. त्याचा भंग झाला, तर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कारण, ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या जोरदार प्रसारामुळे पुण्यातच नाही, तर संपूर्ण राज्यात राज्य सरकारने निर्बंध नव्याने लागू केले आहेत. त्यात रात्रीची संचारबंदी आहे. त्याजोडीने सोहळे व कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही मर्यादा घालण्यात आली आहे. त्यानुसार मोकळ्या जागेतील कार्यक्रमाला अडीचशेचे बंधन टाकले गेले आहे. ते शेकडोंची गर्दी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या वेळी कसे पाळायचे हा प्रश्न आयोजकांना भेडसावतो आहे. दरम्यान, काल (ता.25 डिसेंबर) ओझर येथे घातलेल्या अटीचे उल्लघन झाल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
शेळके यांच्या शर्यतीतील बक्षिसाबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, आढळऱाव भरवित असलेल्या या बारीत बक्षिसांची खैरात करण्यात आली आहे. तेथे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमाकांसाठी अनक्रमे एक लाख, ७५ हजार आणि पन्नास हजार रोख रुपयांचे ईनाम आहे. तसेच, फळीफोडमध्ये पहिल्यात पहिल्या येणाऱ्याला दोन एलईडी, दुसऱ्यातील पहिल्याला दोन फ्रिज तर, तिसऱ्यातील पहिल्याला दोन जुंपते गाडे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. फायनल सम्राटमध्ये पहिल्या क्रमाकांसाठी एक मोटारसायकल, तर दुसऱ्या व तिसऱ्या नंबरसाठी प्रत्येकी दोन सोन्याच्या अंगठ्या दिल्या जाणार आहेत. तसेच, घाटाचा राजा ठरणाऱ्या बैलगाड्याला दोन सोन्याच्या अंगठ्या आणि आकर्षक ट्रॉफी बक्षीस आहे. या शर्यतीत सामील होणाऱ्या प्रत्येक बैलगाडामालकाला एक आकर्षक ट्रॉफी दिली जाणार आहे. एकूणच काही वर्षानंतर बैलगाडा मालकांना लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने मिळालेली आहे.
Read also:
- “एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
- “१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
- फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
- ४0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव, जीन्स घालणाऱ्या मुलींवर नाही, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान
- एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल