मुंबई – अनिल परब यांना सीबीआयचं समन्स देण्यात आलं असल्यासं वृत्त समोर आलं आहे. अनिल परबांनी याबाबत एक महिन्याची वेळ मागितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचा सीबीआयनं समन्स पाठवल्याचं वृत्त हाती येतंय. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल परब यांनी या समन्सबाबत एक महिन्याची मुदत मागितली असल्याची माहिती मिळते आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणी हे समन्स पाठवलं असल्याचाी माहिती मिळतेय. याआधी सीताराम कुंटे आणि डीजीपींचीही चौकशी करण्यात आली होती.
राज्यात पाच महिन्यात १०७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; ठाकरे सरकारची माहिती
मला असं कुठलंही समन्स आलेलं नसल्याचं अनिल परब यांनी म्हटलंय. टीव्ही नाईन मराठीशी बोलताना त्यांनी सीबीआय समन्स आल्याचं वृत्त फेटाळलंय. त्याचप्रमाणे समन्स आलेलंच नाही तर वेळ कशासाठी मागायचा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा डाव असून, अनिल परबांना पाठवलेली समन्स हा देखील त्याचाच एक भाग असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर भाजपचे नेते यंत्रणांना हाताशी घेऊन महाराष्ट्रातील मंत्री आणि नेत्यांना बदनाम करण्यासाठी राजकारण करत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे.
Read also:
- “भारतीय जनता पक्षाचं “संबंधित पात्र” पुन्हा बरळलं”; रुपाली ठोंबरेंचा संबित पात्रांवर हल्लाबोल
- “त्या पेनड्राईव्हचा सोर्स काय? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक”
- “गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!
- फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…