मुंबई : महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेनेने आपल्या काही नेत्यांना डच्चू दिलेला आहे. त्यात माजी मंत्री तानाजीराव सावंत यांचाही समावेश आहे. तानाजीराव सावंत यांचे मागच्या सत्ताकाळात शिवसेनेमध्ये मोठे राजकीय वजन होते.
एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
मात्र नंतर काही चुकीच्या भूमिकांमुळे आणि स्थानिक पदाधिकारी, नेत्यांचा असलेल्या विरोधामुळे आता शिवसेनेने त्यांना लांब ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजीराव सावंत यांच्यात समोरासमोर चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर सावंत हे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असं देखील बोललं जात होते आणि आताही बोललं जात आहे. त्यांनी हिवाळी अधिवेशनावेळी तत्कालीन मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत सुमारे अर्धा तास त्यांनी फडणवीसांशी बंद दाराआड चर्चा केली होती.
काल पंढरपुरात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. येणाऱ्या दोन-चार महिन्यात दिवस बदलतील, मी नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. मग माझ्याकडे काय मागायचे ते मागा , असे आवाहन उपस्थितांना केले. कोरड्या राजकारणात आपल्याला रस नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे आता त्यांचे नवे रुप नेमके काय असणार आहे, याची उत्सूकता त्यांच्या समर्थकांसह संपूर्ण राजकीय जाणकारांना लागली आहे. गेल्या युतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवसेनेतील वजनदार नेते म्हणून तानाजी सावंत ओळखले जातात. पण राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सावंत झाकोळले गेले.
Read also:
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ
- “एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
- “१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
- फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”