मुंबई – राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्याविरोधात संत कालीचरण महाराज यांनी अपशब्द उच्चारले आहेत. यामुळे महात्मा गांधी यांचा अवमान झाला आहे. कालीचरण महाराजांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही उमटले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून कालीचरणर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर गृहमंत्री अमित शाह यांनी कारवाई करण्याची मागणी केली. यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घणाघात केला आहे. राज्य सरकारमध्ये असताना तुम्हीच कारवाईची मागणी करत आहेत. यामुळे मलिकांनी माफी मागितली पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे की, सभागृह सहमत आहे. विधानसभा सदस्य आज नाहीत तेही नवाब मलिकांच्या विधानाला सहमत असतील. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संबंधात वाईट शब्दाचा उपयोग गेला. त्याच्यामुळे महात्मा गांधी यांचा अवमान झाला तर त्याला शिक्षा दिली पाहिजे असे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
“१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
एक प्रश्न उपस्थित झाला आहे. तुम्ही स्वतः मंत्री आहात, कारवाई करण्याची जबाबदारी तुमची आहे. बाकी वेळी आम्ही सामूहिक आणि आता गृहमंत्र्यांची जबाबदारी, खर तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे या राज्यात महात्मा गांधी यांचा अपमान झाल्यानंतर राज्य सरकार हातावर हात घेऊन गप्प बसत आहे. हे सभागृहाची वाट पाहत आहेत. १५ हजार कोटी पोलिसांवर खर्च करतो आहे. मारा ना या लोकांचे पालन पोषण तुम्ही केले आहे. का नाही अटक केली? पोलीसांनी का अटक का केली नाही असा माझा प्रश्न असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “नितेश राणे चुकीचेच, पण तुम्ही सुद्धा हुप हुप केले होते..”, भास्कर जाधवांच्या मागणीनंतर फडणवीसांचा संताप
- नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
- “सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती