मुंबई – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून विरोधक सातत्याने वेगवेगळ्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘सरकार हरवलं आहे’ अशा आशयाचा सदरा परिधान करत आगळ्या वेगळ्या अंदाजात ठाकरे सरकार विरोधात रोष प्रकट केला आहे. इंग्रज परवडले, त्यांनी कमी लुटलं पण त्याही पेक्षा जास्त लुटणारं हे सरकार असल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीच्या संदर्भातही चव्हाण यांनी रोष व्यक्त केला आहे.
“पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?”
संपूर्ण राज्याची विल्हेवाट ठाकरे सरकराने लावली आहे. २०१८ मध्ये ११५ विद्यार्थ्यांनी एमपीएससीची परीक्षा दिल्यानंतर आज पर्यंत त्यांना नियुक्ती देण्याबाबत सरकार अपयशी ठरलं आहे. हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरलं आहे. या सरकारचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निषेध करतो. कारण माझ्या मतदारसंघात एक, दोन नाही तर पाच वेळा महापूर आला. त्यामुळे अनेक गाई, गुरं, ढोरं वाहून गेले आणि लोकं सुद्धा बेघर झाले. त्यावेळी सरकारने येथील लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. परंतु हे सरकार वांद्यात सापडलेलं सरकार आहे, असं आमदार मंगेश चव्हाण म्हणाले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांना आता खांद्यावर घेऊन जायची वेळ आली आहे. तरी हे आघाडी आणि जुलमी सरकार इंग्रजांपेक्षा लुटारू सरकार आहे. अशा प्रकारचं लुटारू सरकार राज्याच्या इतिहासात कुठेच पाहिलं नाही. जनतेच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही विधिमंडळात येतो. परंतु जनेतेचे प्रश्न मांडण्यासाठी आमचा आवाज दाबला जातोय. त्यामुळे आम्ही प्रश्न कोणासमोर मांडावेत, हाच मोठा प्रश्न आहे, असं चव्हाण म्हणाले.
ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, असे असतील नवे निर्बंध..!
शेतकऱ्यांची वीजतोडणी तसंच MPSC परीक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आंदोलन केलं आहे. यावेळी सरकार कूल वसुली फुल, जनतेच्या प्रश्नाकडे सरकारची पाठ, महाराष्ट्राची लावली वाट अशा पद्धतीचे पोस्टर्सही घेऊन विरोधक सरकारचा निषेध करताना दिसत आहेत. यावेळी राज्यातल्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधक करताना दिसत आहेत.
या आंदोलनादरम्यान भाजपा नेते चंद्रकांत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक नेते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहे. वीजबिलाचा प्रश्न, पेपरफुटी प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे.
Read also:
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ