अहमदनगर – राज्यात झालेल्या विविध परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. म्हाडा, आरोग्य विभाग, टीईटी अशा अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सर्वाचे धागेदोरे हे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?
टीईटी परीक्षेतील गेरप्रकारात मंत्र्यांच्या नीकटवर्तीयांचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळं सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली नाही, तर न्यायालयात जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले. यावर बाळासाहेब थोरातांनी प्रतिक्रिया दिली आहे. पेपरफुटीत कुठलाही मंत्री अडकण्याचा विषय नाही. यात जो जो दोषी असेल त्याला शिक्षा झालेली दिसून येईल. आमची यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे दुसऱ्याला निमंत्रण देण्याची गरज काय ? असा टोला सीबीआय चौकशीच्या मागणीवरून बाळासाहेब थोरातांनी लगावला आहे.
पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आलाय. त्यानंतर म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आलंय. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी घेतली
Read also:
- मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
- “भारतीय जनता पक्षाचं “संबंधित पात्र” पुन्हा बरळलं”; रुपाली ठोंबरेंचा संबित पात्रांवर हल्लाबोल
- “त्या पेनड्राईव्हचा सोर्स काय? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक”
- “गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!