मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनात कामकाजावेळी सदस्यांकडून आक्षेपार्ह हावभाव झाल्यानं सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक घेण्यात आली होती. यानंतर अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सर्व सदस्यांनी आदर्श आचार संहितेचं पालन केलं पाहिजे असं आाहन केलं. काही जणांना कसलाही अनुभव नसतो पण पक्षामुळे ते निवडुन येतात. सदस्यांचे वर्तन कसे आहे. यावर सभागृहाची प्रतिमा ठरते असंही अजित पवार यांनी म्हटलं. सदस्यांचे वर्तन कसे असते, कसं वागलं पाहिजे याची शाळाच अजित पवार यांनी सभागृहात घेतली.
शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
गेल्या काही वर्षांमध्ये काही जणांच्या वर्तनाने सभागृहाच्या मानसन्मानाला धक्का बसला. आपल्या वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल सांगताना अजित पवार म्हणाले की, सकाळी बैठक झाली तेव्हा सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित होते. पक्षीय जोडे बाजूला ठेवून चर्चा झाली. त्यावेळी सभागृहातील वर्तनाबद्दल सर्वांनीच चिंता केली. आता विधिमंडळ आवारचे थेट प्रक्षेपण थेट होत असत म्हणून आपलं वर्तन साजेसे ठेवले पाहिजे.
राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढला जातो. खऱंतर हा मतदारांचा अपमान आहे. आपण मत दिलेला माणूस टिंगल टवाळी करतो की मतदान देणाऱ्यांना काय वाटेल. कुत्री, मांजर आणि कोंबड्या या प्राण्यांचे नेतृत्व आपण करत नाही असं म्हणत अप्रत्यक्षपणे नाव न घेता अजित पवार यांनी नितेश राणेंचे कान टोचले.
वाघाला पाहून म्याव म्याव करणारे आज लपून बसले आहेत; माजी गृहमंत्री दीपक केसरकरांचा राणेंना टोला
यावेळी अजित पवार यांनी काही सदस्यांकडून कसं वर्तन केलं जातं हेसुद्धा सांगितलं. अजित पवार म्हणाले की, आम्ही आमदार झालो तेव्हा अध्यक्षांचा, मंत्र्यांचा किती दरारा होता. कोणी आलं तर त्यांना सभागृहात मान दिला जायचा. पण आता कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं. इथेही येऊन बसतात. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा, तुला बसायचं आहे तर पाठिमागे बस. कॅबिनेट मंत्र्यांच्या मागे आम्ही बसायचो, आता एक पत्र झालं की दुसरं द्यायला येतात. एकदाच काय ते द्या असंही अजित पवार यांनी म्हटलं.
Read also:
- “कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा”; अजित पवारांनी खडसावलं
- नितेश राणे कुठेयं, हे मी का सांगू? मुलाच्या अटकेच्या भीतीने नारायण राणे घाबरले?
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
- मोठी बातमी: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक होणार नाही, ठाकरे सरकारच्या बैठकीत निर्णय
- संरक्षण मंत्री असताना मुली लष्करात याव्या यासाठी मी प्रयत्न केले; शरद पवारांचे प्रतिपादन