मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार हे आज रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी पवार साताऱ्यात गेले होते. ते संरक्षण मंत्री असतानाची आठवण त्यांनी आज उदघाट्नच्या कार्यक्रमात बोलून दाखवली.
त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा ते संरक्षणमंत्री होते तेव्हा त्यांनी लष्करात मुली यायला पाहिजेत यासाठी प्रयत्न केले होते. त्यावर एका बड्या लष्कर अधिकाऱ्याने त्यांना म्हटलं होतं की मुलींकडून हे सर्व काही होणार नाही. त्यावर पवारांनी त्याला उत्तर दिले होते की मी संरक्षण मंत्री आहे आणि मी हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या कोर्टात फैसला
पुणे-मुंबईसारख्या शहरात ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी हे उच्च पदावर गेले याचा मला अभिमान आहे. सगळ्यांनी शेती करण्याच्या ऐवजी घरातील एका सदस्याने उत्तम शेती करावी. बाकीच्यांनी संधी मिळेल त्या ठिकाणी काम करून आपलं नाव कमवावे असा सल्लाही यावेळी शरद पवार यांनी दिला आहे. घरातील प्रत्येकच सदस्याने शेती करायची ठरवलं तर ते चालणार नाही हे कर्मवीर अण्णांना माहित होतं. केरळमध्ये अनेकजण भेटले की सोन्याच्या धंद्यात यशस्वी झालेले पाहायला मिळतात. हे सगळं ज्ञानातून, आत्मविश्वासातून येते असेही ते म्हणाले.
अनिल देशमुखांच्या अडचणी संपेना; न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ
आजच्या नव्या पिढीला शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जात पहिली नाही. रयतेचे राज्य म्हणून हिंदवी स्वराज्याकडे पाहिलं जातं. सातारा जिल्हा हा स्वतंत्र चळवळीतील महत्वाचा जिल्हा आहे. आता स्वतंत्र मिळालं, आता ज्ञान मिळवणं हे गरजेचं आहे. हे भाऊराव पाटील यांनी ओळखलं होत. त्यामुळेच त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं. त्याचीच ही एक इमारत असल्याचे पवार म्हणाले.
Read also:
- वाघाला पाहून म्याव म्याव करणारे आज लपून बसले आहेत; माजी गृहमंत्री दीपक केसरकरांचा राणेंना टोला
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; हल्लखोरांकडे पिस्तूल, तलवारी असल्याचा संशय
- आज अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे कोर्टात; नागरपूरचा दौरा अर्धवट सोडून नारायण राणे कणकवलीत दाखल
- ठरलं तर..! राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार; तारीखही फिक्स
- महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका – नाना पटोले