मुंबई – राज्य सरकार स्थिर ठेवण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकरारी यशस्वी झालेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं शरद पवार म्हणाले आहेत.
नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साता-यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यामध्ये, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले आहेत, त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात,” असा टोला शरद पवारांनी लगावला.
नितेश राणेंना अटक होणार? मंत्री नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया…म्हणाले…
“त्यांनी याआधीही अशा प्रकारची विधानं केली आहेत. त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत. त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्यास इच्छुक नाही,” असं सांगत त्यांनी जास्त महत्व देण्यास नकार दिला.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राज्यपालांनी दोन वेळा निवडणुकीच्या तारखा दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारने निवडणूक घेतली नाही हा राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान आहे आणि याच एका मुद्द्यावर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
Read also:
- एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
- ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार; विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर महाविकास आघाडी ठाम
- “उद्धव ठाकरे आजारी असल्याने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करा”
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच वाढला; आवाजी मतदान प्रक्रियेवर राज्यपालांचा आक्षेप
- ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सत्ताधारी-विरोधक एकत्र; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर